Today बुधवार, 27th मे 2026
Breaking News
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Ration Distribution: रेशन व्यवस्थेचा चेहरामोहरा बदलणार; मोदी सरकारने सुरू केली ‘ही’ खास योजना, 80 कोटी जनतेला होणार फायदा

Ration Distribution: रेशन व्यवस्थेचा चेहरामोहरा बदलणार; मोदी सरकारने सुरू केली ‘ही’ खास योजना, 80 कोटी जनतेला होणार फायदा

Ration Distribution: देशातील गरीब आणि मध्यमवर्गीय शिधापत्रिकाधारकांसाठी केंद्र सरकारने एक मोठा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत सार्वजनिक वितरण प्रणालीत (PDS) अमुलाग्र बदल करण्यास मंजुरी देण्यात आली. या ऐतिहासिक निर्णयाचा थेट लाभ देशातील सुमारे ८० कोटी रेशन लाभार्थ्यांना मिळणार आहे. रेशन वाटप प्रक्रिया अधिक पारदर्शक, हायटेक आणि सुलभ करण्यासाठी सरकारने ‘सार्थक-पीडीएस’ (SARTHAK-PDS) ही नवी योजना आणली असून, यासाठी तब्बल २५,५३० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

रेशन वितरण प्रणालीत होणार ३ क्रांतिकारी बदल
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत या योजनेची सविस्तर माहिती दिली. त्यानुसार रेशन व्यवस्थेत खालील तीन महत्त्वाचे बदल केले जातील:

  • १. राज्यांना वाहतूक खर्चासाठी मदत: भारतीय अन्न महामंडळाच्या (FCI) गोदामांमधून जिल्हा, तालुका आणि थेट रेशन दुकानांपर्यंत धान्य वाहून नेण्यासाठी राज्य सरकारांना मोठा खर्च करावा लागतो. हा आर्थिक भार हलवण्यासाठी आता केंद्र सरकार राज्यांना थेट आर्थिक साहाय्य पुरवणार आहे.
  • २. रेशन डीलर्सच्या कमिशनमध्ये वाढ: रेशन दुकानदारांच्या (डीलर्स) कमिशनमध्ये वाढ करण्याची जुनी मागणी केंद्र सरकारने मान्य केली असून, त्यांच्या मानधनात घसघशीत वाढ करण्यात आली आहे.
  • ३. ‘एआय’ तंत्रज्ञानाचा वापर: संपूर्ण वितरण व्यवस्थेत पारदर्शकता आणण्यासाठी आणि बनावट लाभार्थ्यांना चाळणी लावण्यासाठी ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ (AI) सारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. यामुळे पात्र लाभार्थ्यांची नोंदणी प्रक्रिया अत्यंत सोपी होईल.

 या बैठकीत रेशन व्यवस्थेव्यतिरिक्त देशात वाढणाऱ्या तापमानावर आणि उष्णतेच्या लाटांवर (Heatwaves) देखील गंभीर चर्चा झाली. केंद्रीय मंत्री वैष्णव यांनी सांगितले की, या नैसर्गिक संकटाचा सामना करण्यासाठी आरोग्य मंत्रालय, जलशक्ती मंत्रालय आणि इतर यंत्रणा युद्धपातळीवर काम करत आहेत. या कठीण परिस्थितीत संपूर्ण देशाने ‘एक राष्ट्र’ म्हणून एकत्र येऊन काम करावे, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले असून त्यानुसार सर्व मंत्रालये आपापल्या स्तरावर उपाययोजना राबवत आहेत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!