Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Dhule Road Accident: धुळ्यात वऱ्हाडावर काळाचा घाला! नागपूर-सुरत महामार्गावर क्रूझरचा भीषण अपघात; 2 जणांचा जागेवरचं मृत्यू

Dhule Road Accident: धुळ्यात वऱ्हाडावर काळाचा घाला! नागपूर-सुरत महामार्गावर क्रूझरचा भीषण अपघात; 2 जणांचा जागेवरचं मृत्यू

Dhule Road Accident: धुळे जिल्ह्यात लग्नाच्या वऱ्हाडावर काळाने घाला घातला असून, एका भीषण रस्ते अपघातात दोन जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. नागपूर-सुरत राष्ट्रीय महामार्गावर वऱ्हाडी मंडळींना घेऊन जाणारी क्रूझर गाडी उलटल्याने हा थरार घडला. या घटनेत १५ प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

नियंत्रण सुटले अन् गाडीने खाल्ल्या पलट्या
मिळालेल्या माहितीनुसार, हे वऱ्हाड महिर गावाकडून लग्नासाठी निघाले होते. दुपारी तामसवाडी गावाजवळ क्रूझर आली असता, चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. वेग अधिक असल्याने गाडीने महामार्गावरच दोन ते तीन वेळा पलट्या खाल्ल्या. हा अपघात इतका भयानक होता की, गाडीतील दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू असून या घटनेने लग्नाच्या आनंदावर विरजण पडले आहे.

महिला आणि बालकांसह १५ जण जखमी
या अपघातात जखमी झालेल्या १५ जणांमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे. अपघाताचा आवाज ऐकताच परिसरातील ग्रामस्थांनी मदतीसाठी धाव घेतली. स्थानिकांनी तातडीने गाडीत अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढून रुग्णवाहिकेद्वारे साक्री येथील ग्रामीण रुग्णालयात हलवले. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

आनंदाच्या क्षणी कुटुंबावर दुःखाचा डोंगर
लग्नाच्या घरातील लगबग आणि उत्साहाचे वातावरण या एका अपघातामुळे पूर्णपणे विरून गेले आहे. ज्या घरात सनई-चौघड्यांचे सूर घुमणार होते, तिथे आता आक्रोशाचा आवाज ऐकू येत आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत असून, ओव्हरलोडिंग किंवा तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाला का, याची चौकशी केली जात आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!