Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

बस अपघातप्रकरणी अद्याप गुन्हा नाही; धारावीतील तरुण गंभीर

बस अपघातप्रकरणी अद्याप गुन्हा नाही; धारावीतील तरुण गंभीर

धारावी: कुर्त्यात बेस्टच्या ज्या ओलेक्ट्रा कंत्राटी ई-बसचा भीषण अपघात झाला, त्याच कंपनीच्या भरधाव वेगाने जात असलेल्या बसने धारावीत एका तरुणाला धडक दिली. १७ डिसेंबरच्या सकाळी घडलेल्या अपघातात तिमेश येलप्पा पुजारी हा ३२ वर्षीय तरुण गंभीर जखमी झाला. धक्कादायक बाब म्हणजे अपघात घडून पाच दिवस उलटले तरी मुलाच्या उपचारांसाठी आर्थिक मदत मिळालेली नाही, तर धारावी पोलिसांनी याप्रकरणी गुन्हासुद्धा दाखल केला नसल्याचा आरोप जखमी तिमेशची आई अनंतम्मा यांनी केला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बेस्टच्या बस मार्ग क्रमांक १६४ वरून धावणाऱ्या माझगाव ते धारावी आगार या ओलेक्ट्रा कंत्राटी ई-बसने १७ डिसेंबरच्या सकाळी साडेआठच्या सुमारास धारावीतील राजीव गांधी स्पोर्ट्स क्लब, ओएनजीसी सिग्नलजवळ रस्ता ओलांडत असलेल्या तिमेशला जोराची धडक दिली. अपघातात गंभीर जखमी होऊन बेशुद्ध पडलेल्या तिमेशला उपचारांसाठी येथील लाईफ केअर नावाच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारांसाठी सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले.

तिमेश हा तीन दिवस व्हेंटिलेटरवर होता. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून शस्त्रक्रिया करणे गरजेचे असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. पण आपली आर्थिक परिस्थिती नाजूक असून मुलावर उपचार करणे शक्य नसल्याचे तिमेशची आई अनंतम्मा यांनी सांगितले. दरम्यान, मुलाच्या अपघातास कारणीभूत असलेल्या बेस्ट प्रशासन किंवा बस कंपनी यांनी अद्याप काहीच मदत केली नसून पोलीस फक्त माहिती घेऊन गेले, पण गुन्हा दाखल करत नसल्याचा आरोप आई अनंतम्मा यांनी केला आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!