Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Baba Siddique Murder Case: बाबा सिद्दीकींवर गोळीबार होताना ढिम्म राहिलेल्या अंगरक्षकावर कारवाई; सेवेतून कायमची हकालपट्टी

Baba Siddique Murder Case: बाबा सिद्दीकींवर गोळीबार होताना ढिम्म राहिलेल्या अंगरक्षकावर कारवाई; सेवेतून कायमची हकालपट्टी

Baba Siddique Murder Case: महाराष्ट्राचे माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणाने संपूर्ण राज्य हादरले असतानाच, मुंबई पोलिसांनी आता या प्रकरणी प्रशासकीय पातळीवर मोठी कारवाई केली आहे. सिद्दीकी यांचे अंगरक्षक असलेले पोलीस शिपाई श्याम सोनवणे यांना कर्तव्यात कसूर केल्याच्या आरोपावरून पोलीस सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. 12 ऑक्टोबर 2024 रोजी वांद्रे येथे झीशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाबाहेर बाबा सिद्दीकी यांची तीन हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली होती, ज्यावेळी सोनवणे तिथे तैनात होते.

कारवाईचे नेमके कारण काय?
श्याम सोनवणे हे मुंबई पोलिसांच्या ‘संरक्षण आणि सुरक्षा शाखे’मध्ये कार्यरत होते. हत्येच्या घटनेनंतर त्यांच्यावर कर्तव्यात निष्काळजीपणा दाखवल्याचा आरोप ठेवून त्यांना निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर सुरू झालेल्या विभागीय चौकशीत ते दोषी आढळले. विभागाने त्यांना ‘कारणे दाखवा नोटीस’ बजावून स्पष्टीकरण मागितले होते, मात्र समाधानकारक उत्तर न मिळाल्याने अखेर त्यांना बडतर्फीचे पत्र देण्यात आले. 2 मे रोजी त्यांनी या पत्राची पोच दिली असून, आता ते अधिकृतपणे पोलीस दलातून बाहेर पडले आहेत.

२७ आरोपींवर ‘मोका’ आणि ‘बीएनएस’ अंतर्गत गुन्हे दाखल
या हत्या प्रकरणाचा तपास करत असताना मुंबईतील विशेष न्यायालयाने अलीकडेच 27 आरोपींवर ‘मोका’ (MCOCA) आणि भारतीय न्याय संहितेच्या (BNS) विविध कलमांखाली आरोप निश्चित केले आहेत. यामध्ये हत्येचा कट रचणे, शस्त्र कायदा आणि महाराष्ट्र पोलीस कायद्याचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. आरोप निश्चितीची ही प्रक्रिया फौजदारी खटल्यातील महत्त्वाची पायरी मानली जाते, ज्यामुळे आता या प्रकरणाचा कायदेशीर खटला अधिक वेगाने पुढे सरकणार आहे.

लॉरेन्स बिश्नोई टोळीचा कट उघड
मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात या हत्येमागे लॉरेन्स बिश्नोई टोळीचा हात असल्याचे स्पष्ट झाले आहे. या कटाचा मुख्य सूत्रधार म्हणून लॉरेन्सचा भाऊ अनमोल बिश्नोई याचे नाव समोर आले आहे. गुन्हेगारी विश्वात स्वतःचे वर्चस्व आणि दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने अनमोल बिश्नोईने ही हत्या घडवून आणल्याचा दावा सरकारी पक्षाने न्यायालयात केला आहे. या प्रकरणाचा तपास अजूनही सुरू असून आंतरराष्ट्रीय पातळीवर असलेल्या धाग्यादोऱ्यांचा शोध पोलीस घेत आहेत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!