Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

प्रभात कुमार, प्रशांत बुरडे यांना महासंचालकपदी बढती; चार अप्पर पोलीस महासंचालकांच्या बदल्या

प्रभात कुमार, प्रशांत बुरडे यांना महासंचालकपदी बढती; चार अप्पर पोलीस महासंचालकांच्या बदल्या

मुंबई : मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती यांची मुंबई पोलीस आयुक्तपदी नियुक्ती केल्यानंतर आता राज्य सरकारने भारतीय पोलीस सेवेतील १९९३ च्या तुकडीतील वरिष्ठ अधिकारी अप्पर पोलीस महासंचालक प्रभात कुमार आणि प्रशांत बुरडे यांना महासंचालकपदी बढती दिली आहे.

गृहविभागाने शुक्रवारीयाबाबतचे आदेश जारी केले. महाराष्ट्र राज्य नागरी संरक्षण विभागाचे संचालक असलेल्या प्रभात कुमार यांना हे पद उन्नत (महासंचालक दर्जाचे) करून त्याच जागी नियुक्ती देण्यात आली आहे. तर महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभाग पुणे येथे अप्पर पोलीस महासंचालक असलेल्या प्रशांत बुरडे यांना महाराष्ट्र राज्य लोहमार्ग मुंबई हे पद उन्नत करून त्या जागी नियुक्ती देण्यात आली आहे.

वरिष्ठ आयपीएस अधिकारी प्रशांत बुरडे यांच्या नवनियुक्तीने रिक्त झालेल्या अप्पर पोलीस महासंचालक गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे या जागी राज्य पोलीस दलातील नियोजन व समन्वय विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक सुनील रामानंद यांची नेमणूक करण्यात आली आहे. तर, प्रशिक्षण व खास पथके विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक राजकुमार व्हटकर यांची राज्य राखीव पोलीस बलाच्या अप्पर पोलीस महासंचालकपदी बदली करण्यात आली असून, व्हटकर यांच्या बदलीने रिक्त झालेल्या जागी प्रशासन विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक के. एम. एम. प्रसन्ना यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर, लोहमार्ग मुंबईचे अप्पर पोलीस महासंचालक प्रवीण साळुंखे यांची महामार्ग सुरक्षा विभागाच्या अप्पर पोलीस महासंचालक पदावर बदली करण्यात आली आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!