Today सोमवार, 10th नोव्हेंबर 2025
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

साकतचे सरपंच हनुमंत पाटील यांचे ब्रेन हॅमरेजने निधन; 48 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

साकतचे सरपंच हनुमंत पाटील यांचे ब्रेन हॅमरेजने निधन; 48 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

जामखेड: साकतचे सरपंच तसेच शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जामखेड तालुका उपाध्यक्ष हनुमंत मुरूमकर-पाटील (वय 48) यांचे ब्रेन हॅमरेजने बुधवार 15 जानेवारी रोजी रात्री 8:45 वाजता निधन झाले आहे. यामुळे साकतसह जामखेड परिसरात शोककळा पसरली आहे.

हनुमंत मुरूमकर-पाटील यांना 13 जानेवारी रोजी रात्री अकरा वाजता अचानक त्रास होऊ लागल्याने ताबडतोब जामखेड येथील खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. वाटेत घाटाजवळ त्यांना जास्त त्रास झाल्याने जामखेडवरून अहमदनगर आणि पुढे पुणे येथील एका खासगी हॉस्पीटलमध्ये दाखल केले. परंतु, उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.

दरम्यान मंगळवारी कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी स्वत: हॉस्पिटलमध्ये जात डॉक्टरांना भेटून मुरूमकर-पाटील यांच्यावर होणाऱ्या उपचाराची माहिती घेतली. तसेच मेंदूची शस्त्रक्रिया करण्यात यावी, असे सांगितले होते. परंतु, रक्तस्राव मोठ्या प्रमाणावर होत असल्याने त्यांच्यावर शस्त्रक्रिया करता आली नाही. बुधवारी रात्री 8.45 वाजता मुरूमकर-पाटील यांची प्राणज्योत मालवली. हनुमंत मुरूमकर-पाटील यांनी स्वकर्तृत्वावर राजकारण व समाजकारणात एक वेगळा ठसा उमटवला होता. 2010 ते 15 पर्यंत ते साकतचे सरपंच होते. तसेच सध्या त्यांच्याच नेतृत्वाखाली त्यांची भावजयी सरपंच आहेत. कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांचे विश्वासू म्हणून त्यांनी आपले स्थान निर्माण केले होते. ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुका उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!