Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

तुम्ही लावालाव्या करायचे बंद करा, कितीही उलटसुलट प्रश्न विचारले तरी आम्ही एकत्र राहणार; अजित पवारांचे माध्यमांना उत्तर

तुम्ही लावालाव्या करायचे बंद करा, कितीही उलटसुलट प्रश्न विचारले तरी आम्ही एकत्र राहणार; अजित पवारांचे माध्यमांना उत्तर

पुणे: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काही दिवसांपूर्वी पुण्यात बोलले की, पुणे जिल्हा भगवा करू. उद्या मी कुठल्या जिल्ह्यात गेलो, तर तो जिल्हा राष्ट्रवादीचा करू, असे म्हणेन, देवेंद्र फडणवीसही तसे म्हणू शकतात. तुम्ही (प्रसारमाध्यम) लावालाव्या करायचे बंद करा. तुम्ही कितीही उलटसुलट प्रश्न विचारले, तरी आम्ही (महायुती) एकत्र राहायचे ठरवले आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

औंध येथील एका कार्यक्रमावेळी अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. पवार म्हणाले, एकनाथ शिदे यांना पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. कार्यकर्त्यांना स्फूर्ती देण्यासाठी शिंदे तसे बोलले असतील, शेवटी कोणाच्या हातात सूत्रे द्यायची हे जनतेच्या हातात आहे. एखादा गुन्हा घडल्यानंतर माध्यमे घाई करतात. पोलिसांचा तपास तक्रार झाल्यानंतर सुरू होतो. गुन्हेगाराला पकडण्यासाठी प्रयत्न सुरू होतो. अशा घटना घडूच नयेत, हे बरोबर आहे.

स्वारगेट बलात्कार प्रकरणात तोडफोड करण्यात आली, हेही चुकीचे आहे. स्वतःला वेगळे दाखवण्याचा काही जणांचा प्रयत्न अंसतो. सार्वजनिक मालमत्तेचे कोणी नुकसान करत असेल, तर त्याचा खर्च संबंधितांकडून वसूल करावा, असा न्यायालयाचा निर्णय आहे. गुन्ह्याचा तपास झाल्यावर याही प्रकरणात पोलीस योग्य ती कायदेशीर कारवाई करतील, असे पवार यांनी सांगितले.

उत्तम जानकरांबरोबर एकाच गाडीतून प्रवास

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांनी एकाच गाडीमधून प्रवास केला. पुण्यातील सर्किट हाऊसपासून ते कौन्सिल हॉलपर्यंत उत्तम जानकर यांनी अजित पवार यांच्यासोबत एकाच गाडीमधून प्रवास केला. उत्तम जानकर यांच्यासोबत यावेळी उमेश पाटील हेदेखील उपस्थित होते. यावेळी अजित पवार, उत्तम जानकर आणि उमेश पाटील यांची जवळपास दहा मिनिटे चर्चा झाली.

अर्थसंकल्पातून सर्वांना न्याय

राज्याचा अर्थसंकल्प लवकरच सादर केला जाणार आहे. अधिवेशनात आता पुरवणी मागण्या मांडल्या जातील. केंद्र सरकारने त्यांच्या अंदाजपत्रकात समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. राज्य सरकारदेखील आपल्या अर्थसंकल्पात केंद्राप्रमाणेच सर्व घटकांचा विचार करून त्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे पवार यांनी सांगितले.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!