Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

‘माझं कुटुंब नैराश्यात, घरात वाईट प्रसंग घडल्यास’… वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात आरोप झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाणांचा पत्रातून इशारा

‘माझं कुटुंब नैराश्यात, घरात वाईट प्रसंग घडल्यास’… वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात आरोप झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाणांचा पत्रातून इशारा

पुणे: वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकर आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंशिकांत चव्हाण यांच्यावर आरोपांच्या फैरी झडत आहेत. त्यानंतर पुणे शहरातील खडक पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक असणाऱ्या शशिकांत चव्हाण यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी एक पत्र लिहून सविस्तर स्पष्टीकरण दिले आहे.

शशिकांत चव्हाण यांच्या पत्रात नेमकं काय?

प्रसार माध्यमांमध्ये चर्चेत असलेला माझ्यावर दाखल झालेला गुन्हा रजिस्ट्रर नंबर 818/2020 भा.दं.वि. 307 प्रमाणे हा मी दाखल केलेल्या गुन्ह्यातील आरोप असलेले राजेंद्र घनवट याचे वडील माननीय पोपट घनवट यांनी दाखल केला होता. सदर प्रकाराबाबत दि. 7/7/2020 रोजी पोपट घनवट यांच्या तक्रारीवरुन अदखलपात्र गुन्हा रजि. नं. 1521/2020 दि. 8/7/2020 रोजी दाखल करण्यात आला होता. त्यामध्ये मिरा गुलाब सोनवणे, गौतमी प्रविण रोकडे यांनी त्याला हाताने मारहाण करुन शिवीगाळ केली असे नमूद केले होते.

सदर घटनेत पोपट घनवट यांना कोणतीही जखम नसताना पुन्हा त्याच घटनेबाबत दि. 14/7/2020 रोजी गुन्हा रजिस्ट्रर नंबर 818/2020 भा.दं.वि. 307 प्रमाणे जीवे मारण्याचा प्रयत्न केला यासारखा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामध्ये मिरा गुलाब सोनवणे, गौतमी रोकडे, राजू रकम सोनवणे, राहुल सोनवणे, मिलिंद सोनवणे, बबन काशिनाथ सोनवणे व इतर 2 अनोळखी इसमांविरुद्ध तक्रार केली व त्यांना मी फूस लावली आहे.

पोपट घनवट याने स्वतःच उच्चार करुन माझे नाव सदर गुन्ह्यात टाकायला लावले आहे. आरोपीपैकी कोणीही माझ्या नावाचा उल्लेख केलेला नाही. सदर प्रकार हा पाईट खेड येथे झाला होता. व मी त्यावेळी कोविड काळात सातारा येथे होतो. त्यामुळे सदर गुन्ह्याशी माझा कसलाही संबंध नाही. तसे मी तपासी अधिकारी व कोर्ट यांना माझे म्हणणे सादर केले आहे. सदर बाब न्यायप्रविष्ठ आहे.

फिर्यादी असलेल्या गुन्ह्यामध्ये मृत व्यक्तीच्या नावावर माननीय राज घनवट याने त्याचा अंगठा उमटवला आहे, असा सीआयडीने अहवाल दिला आहे. सदर गुन्ह्यात फिर्यादी म्हणून माझ्यावर दबाव आणण्यासाठी माननीय राज घनवट, माननीय पोपट घनवट यांनी वेळोवेळी आरोप केले आहेत.

तब्बल 10 गुन्हे केल्याचे निदर्शनाला आल्याने ज्यांच्याविरुद्ध विविध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल झाले आहेत, असे माननीय पोपट घनवट याचे तक्रारीवरुन माझे, माझी पत्नी, वडील यांच्या बिल्डींग व्यवसाय व उत्पन्नाची उघड चौकशीही झाली आहे. माझ्या कुटुंबाच्या उत्पन्नाचे सर्व स्त्रोत हे पडताळून पाहिल्यावर माझ्याकडे अथवा माझे कुटुंबाकडे अपसंपदा मिळून आली नाही. तसेच यापूर्वी माझ्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यामध्ये कोर्टाने स्वतः पडताळणी करून काहीही तथ्य नसल्याचा अहवाल मंजूर केला आहे.

प्रसार माध्यमातून सातत्याने माझ्यावर होणाऱ्या बातम्यांसह आरोपांमुळे माझे संपूर्ण कुटुंबीय नैराश्यात गेले आहे. त्यामुळे माझ्या घरात एखादा वाईट प्रसंग घडल्यास अशा खोट्या बातम्या पसरवणारे माननीय व त्यांना साथ देणारे जबाबदार राहतील.

पोलिसांना तुमच्या मदतीची गरज आहे. पोलीसांचे मनोधैर्य खच्ची झाल्यास त्याचे सामाजिक आरोग्यावर दुरगामी परिणाम नक्कीच होणार. आपण सुज्ञ आहात, सत्यमेव जयते, जयहिंद, जय महाराष्ट्र

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!