Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Chhatrapati Sambhajinagar : CTET परीक्षेत कडक नियमावलीचा महिलांना मनस्ताप; मंगळसूत्र अन् दागिने उतरवल्यानंतरच प्रवेश

Chhatrapati Sambhajinagar : CTET परीक्षेत कडक नियमावलीचा महिलांना मनस्ताप; मंगळसूत्र अन् दागिने उतरवल्यानंतरच प्रवेश

Chhatrapati Sambhajinagar : केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेच्या (CTET) निमित्ताने आज शहरात एका परीक्षा केंद्रावर खळबळजनक प्रकार पाहायला मिळाला. सकाळी ९:३० वाजता सुरू होणाऱ्या परीक्षेसाठी सात वाजेपासूनच उमेदवारांचे रिपोर्टिंग सुरू झाले होते. मात्र, प्रवेशद्वारावर तैनात असलेल्या सुरक्षा पथकाने तपासणी करताना कमालीची कडक भूमिका घेतली. “अंगावर कोणतेही धातूचे दागिने असतील तर प्रवेश मिळणार नाही,” असे स्पष्ट बजावण्यात आल्याने विवाहित महिलांच्या मंगळसूत्राचाही प्रश्न ऐरणीवर आला. कानातले, नाकातले आणि विशेषतः मंगळसूत्र काढल्याशिवाय आत सोडले जाणार नाही, या केंद्र चालकांच्या भूमिकेमुळे केंद्राबाहेर मोठा गोंधळ उडाला.

एकट्या आलेल्या महिलांची ओढाताण
सुरक्षेच्या नावाखाली करण्यात आलेल्या या अतिरेकी कारवाईमुळे महिला परीक्षार्थींची मोठी तारांबळ उडाली. ज्या महिलांसोबत त्यांचे नातेवाईक होते, त्यांनी आपले दागिने त्यांच्याकडे सोपवले; मात्र लांबून एकट्या प्रवास करून आलेल्या महिलांसमोर मोठे संकट उभे राहिले. आपले मौल्यवान दागिने अनोळखी ठिकाणी किंवा बॅगेत ठेवणे अत्यंत जोखमीचे असल्याने अनेक महिलांची धावपळ झाली. या मानसिक त्रासामुळे काही महिलांना केंद्रावर पोहोचण्यास उशीर झाला, तर काहींनी अत्यंत जड अंतःकरणाने आणि रडत रडत आपले दागिने काढून केंद्रात प्रवेश केला.

उमेदवार आणि पालकांचा तीव्र संताप
प्रशासनाच्या या असंवेदनशील भूमिकेवर उमेदवार आणि पालकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. “सुरक्षा महत्त्वाची असली तरी, मंगळसूत्रासारख्या धार्मिक आणि वैयक्तिक भावना जोडलेल्या गोष्टींबाबत प्रशासनाने आधीच स्पष्ट सूचना द्यायला हव्या होत्या,” अशी भावना परीक्षार्थींनी व्यक्त केली. ऐन परीक्षेच्या वेळी अशा प्रकारच्या गोंधळामुळे उमेदवारांवर मानसिक दडपण येते, असे मत पालकांनी मांडले. एकूणच, नियमांची अंमलबजावणी करताना मानवी दृष्टिकोन आणि संवेदनशीलता जपली जावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!