Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

‘सांगता येईना… सहनही होईना’, भाजपच्या निष्ठावंतांची बिकट अवस्था !

‘सांगता येईना… सहनही होईना’, भाजपच्या निष्ठावंतांची बिकट अवस्था !

पुणे: पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. भारतीय जनता पक्षाने यावेळी १०५ पेक्षा अधिक जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले असून, त्यासाठी अन्य पक्षातील “इलेक्टीव्ह मेरिट” असणाऱ्या माजी नगरसेवकांना पक्षात सामावून घेण्याची रणनीती आखली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, १६ हून अधिक अन्य पक्षांतील माजी नगरसेवकांना लवकरच भाजपमध्ये प्रवेश देण्याची तयारी सुरू आहे. मात्र, हाच मुद्दा आता भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या नाराजीचा केंद्रबिंदू ठरू लागला आहे.

भाजपची रणनिती! पण कार्यकर्त्यांची नाराजी

अनेक प्रभागांमध्ये निष्ठावंत कार्यकर्त्यांनी वर्षानुवर्षे मेहनत घेऊन पक्षाची पकड मजबूत केली असताना, बाहेरचे ‘जिंकणारे चेहरे’ पक्षात आणल्यास ‘आमचे काय’ अशी भावना या कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली आहे. काहींनी याबाबत थेट नाराजी व्यक्त केली असली तरी, वरिष्ठांकडून ‘तुमचा विरोध म्हणजे शीर्षस्थ नेतृत्वाला विरोध’ असेच समजले जाईल, अशी अप्रत्यक्ष बोळवण केली जात आहे. विशेषतः वडगावशेरी, शिवाजीनगर, पर्वती या मतदारसंघात ज्यांच्या विरोधात सदैव लढा दिला.त्यांनाच भाजपमध्ये प्रवेश देऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरवले जात असेल तर ‘आम्ही कसा प्रचार करायचा ‘असा सवाल भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते उपस्थित करत आहेत.

हेही वाचा – सोलापुरात भाजपचा मोठा राजकीय डाव! शिंदे आणि अजित पवार गटाला धक्का

वडगावशेरी विधानसभा मतदारसंघात आमदार पुत्राच्या भाजप प्रवेशाला निष्ठावंतांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. ज्यावेळी या भागात पक्षाचे प्राबल्य नव्हते,त्यावेळी आम्ही झोकून देऊन काम केले. पक्षासाठी आजही काम करत असताना ‘बाहेर’चा उमेदवार कशासाठी आणि ‘तो’ उमेदवार या मतदारसंघातील आठ -नऊ जागांवर कोणा-कोणाला उभे करायचे हे ठरवत असेल तर आम्ही प्रचार कसा काय करायचा आणि आमचे काय ? अशी व्यथा येथील निष्ठावंतांची आहे. तर शिवाजीनगर मतदारसंघात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत विद्यमान आमदारांचे मताधिक्य वाढविण्यास जमेच्या ठरलेल्या राष्ट्रवादीतील ‘दादां’विरोधात निष्ठावंतांनी एकीची मोट बांधली असली तरी भाजपच्या पक्ष श्रेष्ठींनी ‘दादां’नाच अनुकूलता दाखवली आहे.

‘पर्वती’ मध्ये, माजी उपमहापौरांसह त्यांच्या घरात किती ‘तिकिटे’ मिळणार यामुळे भाजपचे निष्ठावंत धास्तावले आहेत.परिणामी पक्षाच्या तळागाळातील कार्यकर्त्यांच्या मनात उमटणारा हा असंतोष, आगामी निवडणुकीत भाजपसाठी डोकेदुखी ठरू शकतो, अशीही चर्चा पक्षांतर्गत रंगू लागली आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!