Today मंगळवार, 21st एप्रिल 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस मुख्यमंत्र्यांच्या मदतीनंतर भाजपमध्ये जाणार?

शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस मुख्यमंत्र्यांच्या मदतीनंतर भाजपमध्ये जाणार?

अहिल्यानगर: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रतापराव ढाकणे यांचे भविष्यातील राजकीय पाऊल सध्या मतदारसंघ आणि राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केदारेश्वर साखर कारखान्यास ४० कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केल्याने ढाकणे यांच्या आगामी नगरपालिका, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीतील भूमिका याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे.

गत विधानसभा निवडणुकीत शेवगाव-पाथर्डी मतदारसंघात अत्यंत चुरशीची लढत झाली होती, अखेर भाजपच्या मोनिका राजळे यांनी बाजी मारली. राष्ट्रवादीच्या प्रतापराव ढाकणे व माजी आ. चंद्रशेखर घुले, जनशक्तीच्या हर्षदाताई काकडे यांना पराभव पत्करावा लागला होता. आता हे सर्व नेते पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत उतरू इच्छित असल्याने त्यांच्या राजकीय भूमिका काय असतील, हा सर्वांसाठी मोठा प्रश्न बनलेला आहे.

हेही वाचा – राफेलच्या वेगाने फाईल हलली! मुंबईत भाजपच्या नव्या प्रदेश मुख्यालयाच्या भूमिपूजनावरून संजय राऊतांचा भाजपवर निशाणा

राजकीय वर्तुळात चर्चा आहे की, ढाकणे यांची मुख्यमंत्री फडणवीसांकडे वाढलेली जवळीक आणि सुमनताई ढाकणे प्रतिष्ठानकडून भरीव आर्थिक मदत यामुळे काही महिन्यांपासून त्यांच्या भाजपमध्ये प्रवेशाची चर्चा जोर धरत आहे. मात्र प्रतापराव ढाकणे यांनी अद्याप कोणतीही राजकीय स्पष्ट भूमिका घेतलेली नाही. ते शरदचंद्र पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे सध्या प्रदेश सरचिटणीस आहेत आणि शेवगाव-पाथर्डी मतदारसंघात त्यांची राजकीय भविष्यकाळात भूमिका नेमकी काय असेल, याकडे मतदारसंघात आणि राजकीय विश्लेषक यांचे लक्ष लागले आहे. शेवगाव-पाथर्डी मतदारसंघात मैत्रीपूर्ण पण तिरंगी चौरंगी लढत होण्याची दाट शक्यता दिसत आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!