Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

11 वर्षांनी राज ठाकरे व उद्धव ठाकरे एकत्र; बाळासाहेबांच्या स्मृतीदिनानिमित्त राज ठाकरेंची काकांसाठी भावनिक पोस्ट

11 वर्षांनी राज ठाकरे व उद्धव ठाकरे एकत्र; बाळासाहेबांच्या स्मृतीदिनानिमित्त राज ठाकरेंची काकांसाठी भावनिक पोस्ट

Balasaheb Thackeray Smrutidin: स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 13 व्या स्मृतीदिनानिमित्त आज (17 नोव्हेंबर) दादर येथील स्मृतीस्थळी भाविकांची गर्दी पाहायला मिळाली. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे हे दोघेही सकाळी स्मृतीस्थळी उपस्थित राहिले. जवळपास 11 वर्षांनी दोन्ही भाऊ एकत्र बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी दिसल्याने शिवसैनिकांसह सर्वांचे लक्ष या क्षणाकडे वेधले गेले. या भेटीनंतर राज ठाकरेंनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. तसेच भाजप तसेच शिंदे गटावर अप्रत्यक्षपणे टीका केली.

हिंदुत्व ही बाळासाहेबांसाठी अस्मिता, मतांचा व्यवसाय नव्हता – राज ठाकरे

राज ठाकरे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले की, शिवसेना पक्षाचे संस्थापक, हिंदुहृदयसम्राट आणि माझे काका स्व. बाळासाहेब ठाकरे यांची आज पुण्यतिथी. देशाच्या इतिहासात भाषिक अस्मितेच्या जोरावर एक प्रचंड चळवळ निर्माण करून त्यातून एका राजकीय पक्षाला जन्म देणारे बाळासाहेब. आणि पुढे जातीय अस्मिता तीव्र होण्याच्या काळात आणि भारतीय जनता पक्षाचा कमंडलवाद फोफावायच्या आधी हिंदू म्हणून अस्मिता जागी करणारे बाळासाहेबच.

हेही वाचा – ‘काम करायची इच्छा नसेल तर पद सोडा’, राज ठाकरेंनी पुण्यातील शाखा अध्यक्षांना फटकारले

राज ठाकरे यांनी पुढे म्हटलं आहे की, ‘पण म्हणून बाळासाहेबांनी हिंदूंकडे व्होटबँक म्हणून नाही पाहिलं. त्यांच्यासाठी हा विषय अस्मितेचा होता, धर्माप्रतीच्या प्रेमाचा होता. आणि हे करताना बाळासाहेबांनी, प्रबोधनकारांकडून आलेला तर्कवाद पण सोडला नाही. बाळासाहेब हे कमालीचे हिंदुप्रेमी होते, पण म्हणून त्यांच्यातली चिकित्सक वृत्ती लोप पावली नाही. त्यामुळे बाळासाहेबांची प्रतिमा चोरून हिंदुत्वाचे वारस म्हणून मिरवणाऱ्यांची किंवा त्यावर मतं मागणाऱ्यांची गंमत वाटते. ना त्यांना बाळासाहेब माहित आहेत, ना त्यांना प्रबोधनकार माहित आहेत, ( अर्थात ऐकणं आणि वाचणं यांचा दुष्काळ असल्यामुळे ) त्यामुळे त्यांना बाळासाहेबांच्या विचारांची झालेली मशागत किती समृद्ध होती ह्या पुसटशी देखील कल्पना नाही !’

फक्त मतं, सत्ता मिळवणे आणि ती सत्ता मिळाल्यावर वाट्टेल तसं ओरबाडणं म्हणजे राजकारण हे रूढ होत असताना, समाजकारण आधी आणि मग राजकारण हे आमच्या विचारात रुजवणाऱ्या बाळासाहेबांच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे विनम्र अभिवादन, असं म्हणत राज ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे गटाला टोला लगावला आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!