Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

भाजपला मोठा धक्का! चंद्रपूरमध्ये भाजपच्या चार नगरपरिषदांमध्ये बंडाची लाट

भाजपला मोठा धक्का! चंद्रपूरमध्ये भाजपच्या चार नगरपरिषदांमध्ये बंडाची लाट

चंद्रपूर: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना वेग आला असून, निवडणूक आयोगाने नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांसाठी अधिकृत कार्यक्रम जाहीर केला आहे. जाहीर वेळापत्रकानुसार, २ डिसेंबर रोजी मतदान तर ३ डिसेंबरला मतमोजणी पार पडणार आहे. दरम्यान, उमेदवारी अर्जाचा आज शेवटचा दिवस असल्याने राजकीय हालचालींना मोठा वेग आला आहे. इच्छुक उमेदवार एका पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश करत असल्याने पक्षश्रेष्ठींना शेवटच्या क्षणी उमेदवार निवडीची कसरत करावी लागत आहे.

निवडणुकीची घोषणा होताच सर्वाधिक पक्षांतरे भाजपात झाल्याचे चित्र दिसले. भाजपा, राष्ट्रवादी (अजित पवार गट) आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील मित्रपक्ष समीकरणांमध्येही हालचाली वाढल्या. अशातच चंद्रपूर जिल्ह्यातून भाजपसाठी मोठा धक्का समोर आला आहे. जिल्ह्यातील चार नगरपरिषदांमध्ये भाजपच्या अधिकृत उमेदवारांविरोधात बंडाची लाट उसळली आहे.

हेही वाचा –इंदापूरमध्ये कृष्णा-भिमा स्थानिक विकास आघाडी स्थापन; वरिष्ठ नेत्यांसोबतच्या चर्चेनंतर मोठा निर्णय

चंद्रपूर जिल्ह्यातील बंडखोरीची परिस्थिती

भद्रावती: भाजप शहराध्यक्ष सुनील नामोजवार यांनी अचानक काँग्रेसमध्ये प्रवेश करून तेथून नगराध्यक्ष पदाची उमेदवारी मिळवली.

राजुरा: भाजपचे नगरसेवक राजेंद्र डोहे यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आणि त्यांनाही नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देण्यात आली.

वरोरा: भाजपाच्या अधिकृत उमेदवार माया राजुरकर यांच्याविरोधात बंडखोर वसुधा वरघणे रिंगणात उतरल्या.

गडचांदूर: अधिकृत उमेदवार अरुण डोहे यांच्या विरोधात निलेश ताजणे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून सरळ आव्हान दिले आहे.

या सर्व घडामोडींमुळे भाजपसमोर मोठे राजकीय आव्हान उभे राहिले आहे, तर जिल्ह्यातील निवडणुकीचा सामना अधिक चुरशीचा होण्याची शक्यता आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!