Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

सुरक्षा दलाला मोठं यश! माडवी हिडमाला ठार केल्यानंतर आणखी एका चकमकीत 7 नक्षलवाद्यांचा खात्मा

सुरक्षा दलाला मोठं यश! माडवी हिडमाला ठार केल्यानंतर आणखी एका चकमकीत 7 नक्षलवाद्यांचा खात्मा

Andhra Pradesh Encounter: नक्षलवादी नेता माडवी हिडमा याच्या खात्म्यानंतर दुसऱ्याच दिवशी आंध्र प्रदेशात माओवादी संघटनेला मोठा फटका बसला आहे. मारेदुमिल्ली (अल्लुरी सीतारामराजू जिल्हा) परिसरात बुधवारी सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत सात माओवादी ठार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. गुप्तचर विभागाचे एडीजी महेश चंद्र लड्ढा यांनी सांगितले की, मृतांमध्ये तीन महिला माओवादींचा समावेश आहे. एका मृत माओवादीची ओळख मेतुरी जोखा राव उर्फ शंकर अशी झाली असून, तो श्रीकाकुलमचा रहिवासी आणि AOB (आंध्र–ओडिशा बॉर्डर) कमिटीचा प्रभारी (ACM) होता. शंकर हा शस्त्रास्त्र निर्मिती, तांत्रिक साधने आणि संप्रेषणाचा तज्ज्ञ असल्याची माहिती मिळत आहे.

हिडमाचा खात्मा

मंगळवारी छत्तीसगड–आंध्र सीमेवर झालेल्या चकमकीत कुप्रसिद्ध नक्षलवादी माडवी हिडमा (51), त्याची पत्नी मडकम राजे, आणि इतर चार नक्षलवादी ठार झाले होते. हिडमा हा गेल्या दोन दशकांतील अनेक भीषण हल्ल्यांचा सूत्रधार मानला जात होता. छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साई यांनी म्हटले की, ही कारवाई डाव्या अतिरेकीवादाविरुद्धच्या लढाईतील निर्णायक यश आहे. बस्तर रेंजचे पोलिस महानिरीक्षक सुंदरराज पट्टीलिंगम यांनीही याला ऐतिहासिक दिवस म्हटले. हिडमाचा मृत्यू हा नक्षलविरोधी कारवाईच्या इतिहासातील सर्वात महत्त्वपूर्ण यशांपैकी एक आहे, असे ते म्हणाले.

दंडकारण्यातील दहशतीचा अंत

हिडमा हा झिरम व्हॅली (2013) हल्ल्यासह अनेक मोठ्या हल्ल्यांसाठी जबाबदार होता. सरकार व पोलिसांकडून वारंवार आवाहन करूनही त्याने मुख्य प्रवाहात परतण्यास नकार दिला. पोलिसांच्या मते, या सलग कारवायांमुळे माओवादी तळांना मोठा धक्का बसला असून उरलेल्या कार्यकर्त्यांनी शस्त्र सोडून शांततेचा मार्ग स्वीकारावा, हा स्पष्ट संदेश दिला गेला आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!