Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Dharmendra Passes Away: ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांचे निधन; वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Dharmendra Passes Away: ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांचे निधन; वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Dharmendra Passes Away: बॉलिवूडच्या सुवर्णयुगातील दमदार अभिनेता आणि चाहत्यांच्या हृदयात खास स्थान निर्माण करणारे धर्मेंद्र यांचे आज निधन झाले आहे. ८९ वर्षांचे धर्मेंद्र गेल्या काही आठवड्यांपासून प्रकृती समस्यांशी झुंज देत होते आणि मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. डॉक्टरांनी अनेक दिवस शर्थीचे प्रयत्न केले, मात्र अखेर आज त्यांनी शेवटचा श्वास घेतला. या दुःखद बातमीनंतर बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे.

वाढदिवसापूर्वीच काळाने हिरावला हिरा

धर्मेंद्र यांना रुग्णालयातून १२ नोव्हेंबर रोजी डिस्चार्ज देण्यात आला होता आणि त्यांच्या घरी अगदी साध्या वातावरणात देखरेख सुरू होती. कुटुंबीय ८ डिसेंबरला होणाऱ्या त्यांच्या ९० व्या वाढदिवसाची तयारी करत होते. मात्र नियतीने त्यांना त्याआधीच हिरावून घेतलं.

खोट्या बातमीने कुटुंबीय संतप्त

काही दिवसांपूर्वी धर्मेंद्र यांच्या प्रकृतीविषयी अफवा पसरवल्या गेल्या होत्या. त्यांच्या निधनाची खोटी बातमी व्हायरल झाल्यावर पत्नी हेमा मालिनी, मुलगी ईशा देओल आणि मुलगा सनी देओल यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती.

६५ वर्षांची कारकीर्द, ३०० पेक्षा अधिक चित्रपटांचा ठसा

धर्मेंद्र हे केवळ रोमँटिक हिरो नव्हते, तर अ‍ॅक्शन, ड्रामा आणि विनोद अशा सर्वच प्रकारात ते पारंगत होते. त्यांनी ३०० हून अधिक चित्रपटांत काम केलं. त्यांनी “शोले”, “सीता और गीता”, “चुपके चुपके”, “धरम वीर”, “अनुपमा” यांसारख्या चित्रपटात अविस्मरणीय भूमिका केली. धर्मेंद्र यांच्या निधनाने बॉलिवूडचे एक अढळ स्तंभ कोसळला आहे. लाखो चाहत्यांसाठी आणि कला-सृष्टीसाठी ही अपूरणीय हानी आहे. त्यांच्या अभिनयाचा वारसा पुढील अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!