Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Sudha Murty: सुधा मूर्तीं यांनी संसदेत केल्या दोन मोठ्या मागण्या; म्हणाल्या, शाळांमध्ये ‘ही’ गोष्ट बंधनकारक करा

Sudha Murty: सुधा मूर्तीं यांनी संसदेत केल्या दोन मोठ्या मागण्या; म्हणाल्या, शाळांमध्ये ‘ही’ गोष्ट बंधनकारक करा

Sudha Murty: राज्यसभेच्या नामांकित सदस्य आणि समाजकार्यकर्त्या सुधा मूर्ती यांनी हिवाळी अधिवेशनात दोन महत्त्वपूर्ण मुद्दे उपस्थित करत सरकारचे लक्ष वेधले आहे. त्यांच्या या प्रस्तावांना केंद्र सरकार सकारात्मक प्रतिसाद देईल का, याबद्दल आता चर्चेला उधाण आले आहे.

3 ते 6 वयोगटातील मुलांसाठी शिक्षण हक्क कायद्यात सुधारणा

सुधा मूर्तींनी राज्यसभेत खाजगी सदस्याचा ठराव मांडताना शिक्षणाचा हक्क (RTE) कायदा 3 ते 14 वर्षांपर्यंत विस्तारित करण्याची मागणी केली. सध्या हा कायदा फक्त 6 ते 14 वयोगटातील मुलांना शिक्षणाचा अधिकार प्रदान करतो. त्यांनी म्हटलं की, एखाद्या मुलाचा 85 टक्के मानसिक विकास तीन ते सहा वयाच्या कालावधीत घडतो. हा टप्पा सर्वात नाजूक आणि महत्त्वपूर्ण असतो, त्यामुळे त्यांचा कायद्यात समावेश अनिवार्य आहे. या बदलामुळे सरकारला नवीन शाळा उभाराव्या लागतील, अतिरिक्त साधनसामग्री निर्माण करावी लागेल. प्रक्रिया वेळखाऊ असली तरी सुरुवात होणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा – Winter Session: सभागृहात मंत्री येत नसतील, तर त्यांच्यावर बिबटे सोडा! सुधीर मुनगंटीवार यांची सरकार विरोधात आक्रमक भूमिका

शाळांमध्ये ‘वंदे मातरम’ अनिवार्य करा

दरम्यान, ९ डिसेंबरच्या चर्चेत सहभागी होताना सुधा मूर्तींनी प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये ‘वंदे मातरम’ गीत अनिवार्य करण्याची मागणी केली. त्यांनी म्हटलं की, मी येथे केवळ खासदार म्हणून नाही, तर भारतमातेची कन्या म्हणून बोलत आहे. स्वातंत्र्यलढ्यात वंदे मातरमने जनतेत जी जाज्वल्य देशभक्ती निर्माण केली, ती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचली पाहिजे. जर मुलांना हे गीत नियमित शिकवले नाही तर पुढील पिढी त्याचा मूळ मजकूर विसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने शाळांमध्ये हे गीत शिकवण्याचे आदेश देऊन देशभक्तीची परंपरा जपावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!