Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Uddhav Thackeray: भाजपची नीती ही चाणक्य नीती नसून…; उद्धव ठाकरेंचा अमित शहा आणि फडणवीसांवर निशाणा

Uddhav Thackeray: भाजपची नीती ही चाणक्य नीती नसून…; उद्धव ठाकरेंचा अमित शहा आणि फडणवीसांवर निशाणा

Uddhav Thackeray: शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एका विशेष मुलाखतीद्वारे भाजपच्या धोरणांवर आणि राज्यातील सत्ताधाऱ्यांवर कडाडून टीका केली आहे. भाजपची कार्यपद्धती ही ‘चाणक्य नीती’ नसून ती केवळ ‘कपटनीती’ आहे, अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधताना ठाकरे म्हणाले की, भाजपने केवळ सत्तेसाठी एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून ‘मिंधेसेना’ तयार करून मराठी मतांचे विभाजन करण्याचा डाव आखला आहे. ‘माझे नाव, माझे वडील आणि धनुष्यबाण ही निशाणी चोरली असली, तरी शिवसेना कागदावर संपवता येणार नाही,’ असा ठाम विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

मुंबई महानगरपालिकेच्या आर्थिक स्थितीवरून बोलताना ठाकरेंनी भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले. महापालिकेच्या ९२ हजार कोटींच्या मुदत ठेवींपैकी ७० हजार कोटींच्या ठेवी तोडल्या गेल्या असून, यातील २२ हजार कोटी रुपये भाजपने आपल्या मर्जीतील कंत्राटदारांच्या घशात घातल्याचा दावा त्यांनी केला. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी सुरत लुटली होती, मात्र हे लोक इंग्रजांपेक्षाही वाईट पद्धतीने मुंबईची लूट करत आहेत, अशी घणाघाती टीका त्यांनी केली.

हेही वाचा – PMC Election: मुख्यमंत्री मांडणार पुण्याच्या विकासाचा ‘रोडमॅप’; ‘नॅशनल क्रश’ गिरीजा ओक घेणार देवेंद्र फडणवीसांची विशेष मुलाखत

देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यावरही टीका

यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यावरही शाब्दिक प्रहार केला. निवडणूक प्रक्रियेतील दबावावरून भाष्य करताना, आमच्या टीकेमुळे फडणवीसांना मिरचीची धुरी लागली आहे, पण आता तर आम्ही नुसती सुरुवात केली आहे, असा इशारा दिला. तसेच, अजित पवारांवरील ७० हजार कोटींच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांचे काय झाले? असा सवाल करत, सत्तेसाठी भ्रष्टाचाऱ्यांना मांडीवर घेणाऱ्या भाजपने माफी मागावी, अशी मागणी केली. बदलापूर प्रकरणाचा संदर्भ देत त्यांनी भाजपवर ‘विकृतीला स्वीकृती’ देण्याचा आरोप केला आणि मुख्य आरोपीच्या एन्काउंटरवरून सरकारला धारेवर धरले.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!