Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Pakistan mall fire : शॉपिंग मॉलला भीषण आग; 26 जणांचा मृत्यू, 81 जण बेपत्ता

Pakistan mall fire : शॉपिंग मॉलला भीषण आग; 26 जणांचा मृत्यू, 81 जण बेपत्ता

कराची : पाकिस्तानमधील कराची शहरातील ऐतिहासिक गुल प्लाझा शॉपिंग मॉलमध्ये भीषण आग लागून मोठी दुर्घटना घडली आहे. या आगीत आतापर्यंत 26 जणांचा मृत्यू झाला असून 81 जण अद्याप बेपत्ता आहेत. तब्बल 34 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. मात्र, इमारत अत्यंत असुरक्षित असल्याचा अहवाल प्रशासनाने दिला आहे.

१७ जानेवारी रोजी रात्री उशिरा गुल प्लाझामध्ये अचानक आग लागली. फुटबॉल मैदानाएवढ्या या मॉलमध्ये सुमारे 1,200 दुकाने असल्याची माहिती आहे. आगीच्या ज्वाळा आणि काळा धूर आकाशात पसरल्याने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. बचाव पथकांनी 19 जानेवारीच्या सकाळपर्यंत ढिगारा हटवण्याचे आणि इमारत थंड करण्याचे काम सुरू ठेवले.

मृत्यूंची संख्या वाढण्याची शक्यता

पोलिस प्रमुख जावेद आलम ओधो यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांची ओळख पटवण्यासाठी डीएनए चाचण्या केल्या जात आहेत. आगीत जखमी झालेल्या 18 जणांना प्राथमिक उपचारानंतर रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. मात्र, मॉलची रचना अस्थिर असल्याने बचावकार्य धोकादायक ठरत असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

आग कशी लागली?

प्राथमिक तपासात सर्किट ब्रेकरमधील शॉर्ट सर्किट हे आगीचे कारण असल्याचे समोर आले आहे. मॉलमध्ये मोठ्या प्रमाणावर असलेले कार्पेट, ब्लँकेट आणि ज्वलनशील साहित्य यामुळे आग वेगाने पसरली. खराब वायुवीजनामुळे मॉलमध्ये दाट धूर साचल्याने आत अडकलेल्या लोकांना वाचवणे कठीण झाले.

या दुर्घटनेनंतर स्थानिक रहिवासी आणि दुकानदारांमध्ये तीव्र संताप पाहायला मिळतो आहे. कराचीचे महापौर मुर्तझा वहाब घटनास्थळी पोहोचले असता नागरिकांनी सरकारविरोधी घोषणाबाजी केली. अग्निशमन दलाच्या उशिरा प्रतिसादाबद्दलही संताप व्यक्त करण्यात आला. अनेक दुकानदारांनी सांगितले की 20 वर्षांची मेहनत एका रात्रीत राख झाली.

कराचीतील मोठ्या दुर्घटनांपैकी एक

2012 मधील औद्योगिक आगीच्या घटनेनंतर गुल प्लाझा आगीची घटना कराचीच्या इतिहासातील सर्वात भीषण आगींपैकी एक मानली जात आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने मृतांच्या कुटुंबियांना भरपाई जाहीर केली असून, चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!