Today शनिवार, 2nd मे 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Missing Person Law: सात वर्षे बेपत्ता व्यक्तीस ‘कायदेशीर मृत’ घोषित करता येणार; मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Missing Person Law: सात वर्षे बेपत्ता व्यक्तीस ‘कायदेशीर मृत’ घोषित करता येणार; मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Missing Person Law: गेल्या अनेक वर्षांपासून बेपत्ता असलेल्या व्यक्तींच्या वारसांना मालमत्ता, विमा आणि पेन्शनच्या कामात येणारे कायदेशीर अडथळे आता दूर होणार आहेत. एखादी व्यक्ती सलग ७ वर्षे बेपत्ता असेल आणि तिचा कोणाशीही संपर्क नसेल, तर तिला कायदेशीररित्या ‘मृत’ घोषित केले जाऊ शकते, असा महत्त्वपूर्ण निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे.

नेमकं प्रकरण काय होतं?
बोरीवली येथील एका व्यक्तीचे वडील मागील २२ वर्षांपासून बेपत्ता होते. त्यांना मृत घोषित करण्यासाठी मुलाने न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, कनिष्ठ न्यायालयाने वडिलांना स्मृतीभ्रंश असल्याचा वैद्यकीय पुरावा नाही असे म्हणत ही मागणी फेटाळली होती. उच्च न्यायालयाने हा निकाल रद्द ठरवत स्पष्ट केले की, अशा प्रकरणांत कोणत्याही वैद्यकीय पुराव्याची गरज नाही.

न्यायालयाने काय स्पष्ट केले?
न्यायमूर्तींनी स्पष्ट केले की, भारतीय साक्ष अधिनियम, २०२३ च्या कलम १११ (पूर्वीचा भारतीय पुरावा कायदा, १८७२ – कलम १०८) नुसार ७ वर्षे बेपत्ता असणे हेच ‘सिव्हिल डेथ’ (कायदेशीर मृत्यू) मानण्यासाठी पुरेसे आहे. यासाठी खालील पुरावे ग्राह्य धरले जातील:

  • पोलिसांचा मिसिंग रिपोर्ट (Missing Certificate).
  • वर्तमानपत्रात प्रसिद्ध केलेली शोध जाहिरात.
  • रेशन कार्ड, पासपोर्ट यांसारखी शासकीय कागदपत्रे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निकषांनुसार, व्यक्ती ज्या दिवशी बेपत्ता झाली त्या दिवसापासून नव्हे, तर ७ वर्षांचा कालावधी संपल्यानंतरच्या दिवसापासून तिला मृत मानले जाते.

मृत्यूचा दाखला मिळवण्याची प्रक्रिया कशी असेल?
ज्या कुटुंबातील व्यक्ती दीर्घकाळ बेपत्ता आहे, त्यांना आता या चरणांचे पालन करावे लागेल:

  • पोलीस तक्रार: स्थानिक पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची रीतसर नोंद करणे अनिवार्य.
  • दिवाणी दावा: ७ वर्षे पूर्ण झाल्यावर दिवाणी न्यायालयात (Civil Court) ‘मृत्यू घोषित’ करण्यासाठी अर्ज करणे.
  • कागदपत्रांची पूर्तता: पोलीस अहवाल आणि नातेवाईकांचे शपथपत्र सादर करणे.
  • अधिकृत दाखला: न्यायालयाच्या आदेशानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेकडून (नगरपालिका/पंचायत) अधिकृत मृत्यू दाखला मिळवणे.

या निर्णयाचा फायदा कोणाला?
हा निकाल त्या हजारो कुटुंबांसाठी आशेचा किरण ठरला आहे, ज्यांची मालमत्ता हस्तांतरण, बँक खाती, पेन्शन लाभ किंवा विम्याच्या दाव्यांची कामे केवळ ‘मृत्यू दाखला’ नसल्यामुळे अडकून पडली होती.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!