Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Anjali Damania : अजित पवारांचा अपघात की घातपात? अंजली दमानियांचे ‘या’ तीन नेत्यांवर गंभीर आरोप; नेमकं काय म्हणाल्या?

Anjali Damania : अजित पवारांचा अपघात की घातपात? अंजली दमानियांचे ‘या’ तीन नेत्यांवर गंभीर आरोप; नेमकं काय म्हणाल्या?

Anjali Damania : पुण्यातील मुंढवा जमीन घोटाळ्यावरून राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. पार्थ पवार यांना या प्रकरणात क्लीन चिट मिळण्याच्या चर्चांना पूर्णविराम देत, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पुराव्यांसह जोरदार हल्ला चढवला आहे. “पार्थ पवारांनी कितीही प्रयत्न केले तरी त्यांची या प्रकरणातून सुटका होणार नाही,” अशा शब्दांत त्यांनी आपला निर्धार व्यक्त केला.

चौकशी समितीलाच दिला इशारा
पत्रकार परिषदेत दमानिया यांनी थेट ‘पॉवर ऑफ अटर्नी’ची प्रत प्रसारमाध्यमांसमोर सादर केली. त्यांनी म्हटलं की, शीतल तेजवानी आणि पार्थ पवार यांच्यात झालेल्या व्यवहाराच्या कागदपत्रांवर स्वतः पार्थ पवारांचे नाव, फोटो आणि स्वाक्षऱ्या असल्याचा दावा दमानिया यांनी केला. जर खारगे समितीने या ठोस पुराव्यांकडे कानाडोळा करून पार्थ पवारांना निर्दोष ठरवले, तर आपण ही लढाई थेट मुंबई उच्च न्यायालयात घेऊन जाऊ, असा इशारा त्यांनी दिला आहे.

हेही वाचा – DCM Sunetra Pawar: ‘कोणत्याही अडचणीत मी तुमच्या सोबत’; सुनेत्रा पवार यांची विदिप जाधव कुटुंबियांना सांत्वनपर भेट

अजित पवारांच्या मृत्यूबाबत संशयाचे वादळ
जमीन घोटाळ्याच्या आरोपांसोबतच दमानिया यांनी अजित पवारांच्या अपघाती निधनाबाबत केलेल्या विधानामुळे मोठी खळबळ उडाली आहे. “एखादा पाळीव प्राणी गेल्यावरही माणूस हळहळतो, पण येथे पार्थ पवार, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या चेहऱ्यावर दु:खाचा लवलेशही नाही,” असे म्हणत त्यांनी या नेत्यांच्या भूमिकेवर गंभीर संशय व्यक्त केला. हे सर्व नेते इतक्या घाईत कामाला कसे लागले? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!