Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Palkhi Marg: पालखी मार्गाच्या कामांना वेग; 10 एप्रिलला नितीन गडकरी करणार प्रत्यक्ष पाहणी

Palkhi Marg: पालखी मार्गाच्या कामांना वेग; 10 एप्रिलला नितीन गडकरी करणार प्रत्यक्ष पाहणी

Palkhi Marg: संत श्री तुकाराम महाराज पालखी मार्गावरील अपूर्ण आणि निकृष्ट कामांचा प्रश्न आता मार्गी लागण्याची चिन्हे आहेत. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे दि. 10 एप्रिल रोजी या मार्गाची प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी नागपूर येथे गडकरी यांची भेट घेऊन पालखी मार्गावरील समस्यांकडे लक्ष वेधले, त्यानंतर गडकरी यांनी ही पाहणी निश्चित केली आहे.

अपूर्ण कामांमुळे वारकरी आणि नागरिकांचे हाल
हर्षवर्धन पाटील यांनी नितीन गडकरी यांना पालखी मार्गावरील रखडलेल्या कामांची सविस्तर माहिती दिली. विशेषतः इंदापूर ते माळीनगर दरम्यानचे रस्ते, उड्डाणपूल (Flyovers), भुयारी मार्ग (Underpasses) आणि बाह्यवळण रस्ते (Bypasses) अद्याप पूर्ण झालेले नाहीत. देहू–पंढरपूर मार्गावरील जंक्शन उड्डाणपूल, गोतोंडी उड्डाणपूल, निमगाव केतकी बायपास, वडापुरी उड्डाणपूल, वकीलवस्ती भुयारी मार्ग आणि बावडा बाह्यवळण रस्ता या कामांकडे त्यांनी सरकारचे लक्ष वेधले. कामाअभावी वारकरी आणि स्थानिक नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

टोलवसुलीवरून नाराजी आणि अधिकाऱ्यांना तंबी
रस्त्याची कामे पूर्ण होण्यापूर्वीच सुरू असलेल्या टोलवसुलीबाबत (Toll Collection) हर्षवर्धन पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. वृक्षारोपण, दुभाजक (Dividers), स्ट्रीट लाईट, दिशादर्शक फलक आणि गटारींची कामे अद्याप प्रलंबित असताना टोल कसा आकारला जातो, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. याची दखल घेत गडकरी यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (NHAI) अधिकाऱ्यांना झापले असून, अपूर्ण कामांदरम्यान टोलवसुली कशी सुरू आहे, याचा जाब विचारला आहे. तसेच सर्व कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.

इथेनॉल प्रकल्पावर चर्चा आणि नियोजित दौरा
या भेटीदरम्यान केवळ रस्तेच नव्हे, तर इथेनॉल (Ethanol) प्रकल्पासंदर्भातही सकारात्मक चर्चा झाल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले. नितीन गडकरी यांच्या 10 एप्रिलच्या नियोजित दौऱ्यामुळे पालखी मार्गाच्या कामांना मोठी गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. प्रशासकीय पातळीवर आता या दौऱ्याच्या तयारीला वेग आला असून, प्रलंबित प्रश्न तातडीने सुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!