Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Sanjay Raut On BJP: अजित पवार गटाचे 25 आमदार भाजपच्या वाटेवर? संजय राऊतांच्या विधानाने महायुतीत खळबळ

Sanjay Raut On BJP: अजित पवार गटाचे 25 आमदार भाजपच्या वाटेवर? संजय राऊतांच्या विधानाने महायुतीत खळबळ

Sanjay Raut On BJP: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते खासदार संजय राऊत यांनी जळगाव येथे बोलताना राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली आहे. भारतीय जनता पक्ष आता आपल्याच मित्रपक्षांमध्ये म्हणजेच अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांमध्ये फूट पाडण्याच्या तयारीत असल्याचा गंभीर आरोप राऊत यांनी केला आहे. भाजप या दोन्ही गटांतील आमदारांना आपल्या गोटात खेचण्याचा प्रयत्न करत असून, यामुळे महायुतीमध्ये अंतर्गत धुसफूस वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

अजित पवार गटाचे 25 आमदार भाजपच्या वाटेवर? राऊतांचे भाकीत
राष्ट्रवादी काँग्रेसमधील (अजित पवार गट) अंतर्गत कलहावर भाष्य करताना संजय राऊत म्हणाले की, येत्या काळात या पक्षात मोठी फूट पडू शकते. त्यांच्या दाव्यानुसार, अजित पवार गटातील सुमारे 25 आमदार भाजपमध्ये प्रवेश करू शकतात. केवळ राष्ट्रवादीच नव्हे, तर शिवसेनेच्या शिंदे गटातही अशीच परिस्थिती असून, तिथलेही काही आमदार भाजपच्या दिशेने वळू शकतात, असे संकेत राऊत यांनी दिले आहेत. यापूर्वी ज्या पद्धतीने शिवसेना आणि राष्ट्रवादी फोडली गेली, त्याच धर्तीवर आता भाजप आपल्या मित्रपक्षांचे अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न करत असल्याचे भाकीत राऊत यांनी वर्तवले आहे.

राष्ट्रवादीतील अंतर्गत संघर्ष आणि सुनेत्रा पवारांचे निवडणूक आयोगाला पत्र
दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) नेतृत्वावरून संघर्ष तीव्र झाला आहे. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी पक्षावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होत असतानाच, सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून खळबळ उडवून दिली आहे. सुनेत्रा पवार यांनी आपणच पक्षाच्या कायदेशीर प्रमुख असल्याचे नमूद करत, यापूर्वी सादर करण्यात आलेल्या पत्रांवर कोणतीही कारवाई करू नये, अशी विनंती आयोगाला केली आहे. तसेच, पक्षाच्या बाबींविषयी इतरांनी (पटेल किंवा तटकरे) सादर केलेली निवेदने अवैध ठरवण्यात यावीत, अशी ठाम मागणी त्यांनी पत्राद्वारे केली आहे.

महायुतीत अविश्वासाचे वातावरण; प्रफुल्ल पटेल आणि तटकरेंवर निशाणा
प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तर सुनील तटकरे हे प्रदेशाध्यक्ष असतानाही सुनेत्रा पवार यांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे पक्षात सर्व काही अलबेल नसल्याचे स्पष्ट झाले आहे. संजय राऊत यांनी या संधीचा फायदा घेत भाजपच्या विस्तारवादी धोरणावर टीका केली आहे. भाजपला आता मित्रपक्षांची गरज उरली नसून ते त्यांना हळूहळू संपवत आहेत, असा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. या घडामोडींमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात येत्या काही दिवसांत पुन्हा एकदा मोठ्या सत्तांतराचे किंवा पक्षांतराचे वारे वाहण्याची दाट शक्यता आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!