Today सोमवार, 3rd ऑगस्ट 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Maharashtra Weather Update: राज्यात ऊन पावसाचा खेळ! पुढील 4 दिवस उष्णतेच्या लाट; तर ‘या’ जिल्ह्यांत अवकाळीचा इशारा

Maharashtra Weather Update: राज्यात ऊन पावसाचा खेळ! पुढील 4 दिवस उष्णतेच्या लाट; तर ‘या’ जिल्ह्यांत अवकाळीचा इशारा

Maharashtra Weather Update: राज्यात सध्या हवामानाची दोन टोकाची रूपे पाहायला मिळत आहेत. विदर्भ आणि मराठवाड्यात सूर्याचा दाह प्रचंड वाढला असून दुसरीकडे काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने (IMD) दिलेल्या अंदाजानुसार, पुढील ३-४ दिवस महाराष्ट्रात उन्हाचा तडाखा कायम राहणार असून, मध्य आणि उत्तर-पश्चिम भारतात उष्णतेची लाट (Heatwave) तीव्र होण्याची शक्यता आहे.

तापमानाचा पारा ४२ अंशांच्या पार; विदर्भात उन्हाचा कहर
राज्यात तापमानाचा आलेख वेगाने वर सरकत आहे. विदर्भातील अकोला आणि वाशिम जिल्ह्यांत तापमानाने ४२°C चा टप्पा ओलांडला असून, नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही सरासरी तापमान ४०°C च्या वर गेले आहे. उन्हाच्या या तीव्र लाटेमुळे दुपारच्या वेळी रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत आहे.

विजांसह पावसाचा अंदाज आणि वादळाचा धोका
उन्हाच्या कडाक्यासोबतच राज्यावर अवकाळी पावसाचे संकटही घोंगावत आहे. २४ आणि २५ एप्रिल रोजी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता आहे. कोकण-गोव्यातही काही ठिकाणी पावसाची हजेरी असू शकते. विशेषतः २८ एप्रिल रोजी विदर्भात ३० ते ५० किमी प्रतितास वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता असून हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा कृषी सल्ला
वातावरणातील या बदलांमुळे पिकांचे नुकसान टाळण्यासाठी कृषी विभागाने काही महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत:

  • पिकांना उष्णतेपासून वाचवण्यासाठी सकाळी किंवा संध्याकाळी हलके पाणी देऊन जमिनीतील ओलावा टिकवावा.
  • नवीन लागवड केलेल्या नाजूक रोपांच्या संरक्षणासाठी सावलीची जाळी (Shade Net) वापरावी.

नागरिकांसाठी आरोग्य मार्गदर्शिका
उष्णतेच्या लाटेपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी आरोग्य विभागाने खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. दुपारी १२ ते ४ या वेळेत विनाकारण बाहेर पडणे टाळावे. शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी लिंबू सरबत, ताक आणि भरपूर पाण्याचे सेवन करावे. तसेच बाहेर जाताना हलके, सुती आणि सैल कपडे वापरण्याला प्राधान्य द्यावे, जेणेकरून उन्हाचा त्रास कमी होईल.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!