Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Census 2027 : जनगणना 2027 साठी मोबाईलवर स्वगणना; 1 ते 15 मेदरम्यान संधी, जाणून घ्या स्पेप बाय स्टेप पद्धत

Census 2027 : जनगणना 2027 साठी मोबाईलवर स्वगणना; 1 ते 15 मेदरम्यान संधी, जाणून घ्या स्पेप बाय स्टेप पद्धत

Census 2027 : भारतीय जनगणनेच्या इतिहासात प्रथमच डिजिटल क्रांती होत असून, २०२७ च्या जनगणनेसाठी नागरिकांना आता स्वतःची माहिती मोबाईलवर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. १ ते १५ मे या कालावधीत नागरिक ‘सेल्फ एन्युमरेशन’ (स्वगणना) करू शकणार आहेत. यामुळे प्रगणकांवरील कामाचा ताण कमी होण्यास मदत होईल, असे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

डिजिटल जनगणनेचे दोन टप्पे
यंदाची जनगणना ही देशातील १६ वी आणि स्वातंत्र्यानंतरची ८ वी जनगणना आहे. ही प्रक्रिया दोन टप्प्यांत पार पडणार आहे:
१. पहिला टप्पा (२०२६): घरयादी आणि घरगणना. यात घरांची स्थिती, सुविधा आणि मालमत्तेची माहिती घेतली जाईल.
२. दुसरा टप्पा (२०२७): प्रत्यक्ष लोकसंख्या गणना. यात प्रत्येक व्यक्तीची सविस्तर वैयक्तिक माहिती नोंदवली जाईल.

‘स्वगणना’ कशी करावी? (स्टेप-बाय-स्टेप पद्धत)
नागरिकांना १ मे पासून अधिकृत संकेतस्थळ se.census.gov.in वर जाऊन आपली माहिती भरता येईल:

  • नोंदणी: पोर्टलवर जाऊन आपला मोबाईल क्रमांक नोंदवा.
  • माहिती भरणे: कुटुंबातील सदस्यांची नावे, घराची स्थिती यासह सुमारे ३३ प्रकारची माहिती अर्जात भरावी लागेल.
  • पडताळणी: तुम्ही भरलेली माहिती बरोबर आहे का, याची तपासणी १६ मे ते १५ जून या काळात प्रगणक (Enumerator) प्रत्यक्ष घरी येऊन करतील.
  • प्रमाणन: माहिती योग्य असल्यास प्रगणक ती डिजिटल पद्धतीने सबमिट करतील.

इंटरनेट नसले तरी काम थांबणार नाही!
मोबाईल ॲपच्या माध्यमातून ही जनगणना होत असल्याने अनेकांना इंटरनेटची चिंता होती. मात्र, प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, ‘सेन्सस २०२७-एचएलओ’ (Census 2027-HLO) ॲपमध्ये ऑफलाईन माहिती भरता येईल. एकदा माहिती भरली की, जेव्हा मोबाईल नेटवर्कमध्ये येईल, तेव्हा ती आपोआप शासनाच्या सर्व्हरवर अपलोड होईल.

नागरिकांना आवाहन
एका प्रगणकाला सुमारे १५० कुटुंबांची (७०० ते ८०० व्यक्ती) माहिती गोळा करायची आहे. नागरिकांनी स्वतःहून अचूक माहिती भरल्यास वेळ आणि श्रमाची मोठी बचत होणार आहे. “जनगणनेसाठी प्रशासनाला सहकार्य करा आणि माहिती भरताना ती पूर्णपणे सत्य असल्याची खात्री करा,” असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. सध्या या प्रक्रियेसाठी प्रगणक आणि पर्यवेक्षकांचे प्रशिक्षण युद्धपातळीवर सुरू आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!