Today सोमवार, 15th जून 2026
Breaking News
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Washim Crime: जमीन अन् पैशांसाठी छळ… 4 जणांच्या मृत्यूप्रकरणी सख्ख्या भावासह चौघांवर गुन्हा; मुख्य आरोपी गजाआड

Washim Crime: जमीन अन् पैशांसाठी छळ… 4 जणांच्या मृत्यूप्रकरणी सख्ख्या भावासह चौघांवर गुन्हा; मुख्य आरोपी गजाआड

Washim Crime: वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील तिवळी येथे घडलेल्या एकाच कुटुंबातील चौघांच्या मृत्यूच्या हृदयद्रावक घटनेला आता एक मोठे वेगळे वळण मिळाले आहे. पत्नी व दोन निष्पाप मुलांचा विहिरीत बुडवून खून केल्यानंतर पतीने केलेल्या आत्महत्येप्रकरणी शिरपूर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. कौटुंबिक छळ आणि जमिनीच्या वादातून हा प्रकार घडल्याचे समोर आले असून, मृत व्यक्तीच्या सख्ख्या भावासह त्याच्या कुटुंबातील एकूण चौघांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मालमत्तेचा वाद अन् मानसिक छळ ठरला कारणीभूत
या प्रकरणात मृत संतोष बकाल यांचे मेहुणे सुधाकर सुभाष इंगोले यांनी शिरपूर पोलीस ठाण्यात अधिकृत फिर्याद दिली आहे. या तक्रारीनुसार, संतोष यांच्या हक्काची शेतजमीन, मालमत्तेतील हिस्सा आणि आर्थिक व्यवहारांवरून बकाल कुटुंबामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून तीव्र संघर्ष सुरू होता. या वादातून आरोपी संतोष यांना सतत मानसिक विवंचनेत टाकत असत. त्यांना जाहीरपणे अपमानित करणे, धमकावणे आणि मानसिक दबाव आणणे असे प्रकार सातत्याने घडत होते, ज्याला कंटाळून अखेर त्यांनी हे भीषण पाऊल उचलले.

मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम 108 आणि 3(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. यातील मुख्य संशयित महादेव बकाल याला पोलिसांनी तात्काळ बेड्या ठोकल्या असून, फरार असलेल्या इतर तीन आरोपींचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.

काय होती मूळ घटना?
हा संपूर्ण प्रकार 13 जून रोजी उघडकीस आला होता. तिवळी गावातील ३५ वर्षीय संतोष तुकाराम बकाल यांचा मृतदेह महावितरणच्या पॉवर ग्रीड टॉवरला लटकलेल्या अवस्थेत सापडला होता. त्यानंतर शोध घेतला असता, त्यांची २८ वर्षीय पत्नी वर्षा उर्फ इंद्रायणी बकाल, ७ वर्षांची मुलगी जान्हवी आणि ५ वर्षांचा मुलगा सोहम या तिघांचे मृतदेह गावातीलच एका विहिरीतून बाहेर काढण्यात आले होते. या घटनेने संपूर्ण वाशिम जिल्हा हादरला होता.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!