मुंबई : कॅन्सरच्या विकाराने प्रख्यात अभिनेता ऋषी कपूर यांचे ३० एप्रिल, 2020 मध्ये निधन झाले. त्यावेळी कोरोना आणि लॉकडाऊन सुरु होते. त्यामुळे त्यांच्या लाखो चाहत्यांना त्यांना निरोप देखील देता आला नाही. प्रसिद्ध निर्माता दिग्दर्शक सुभाष घई यांच्या ‘कर्ज’ चित्रपटात ऋषी कपूर यांची महत्वाची भूमिका अर्थात मेन लीड ऍक्टरची होती. त्यानंतर ऋषी कपूरने पुन्हा त्यांच्यासोबत ‘कांची’ द अनब्रेकेबल ‘चित्रपटात काम केले.
दोन्ही चित्रपटादरम्यान चिंटू सुप्त गुण देखील सुभाष घई यांना जाणवले. ऋषी कपूरला संपूर्ण इंडस्ट्री, त्यांचे कपूर खानदान त्यांना ऋषी नव्हे तर चिंटू या टोपण नावाने ओळखत असे. एक उत्तम अभिनेता, तितकाच कुशल डान्सर आयुष्य भरभरून जगणारा आणि तितकाच उत्कट असणारा चिंटू आणि त्याचा मुलगा रणबीर कपूर यांचे आपसांत कधी पटले नाही.
रणबीर आपले म्हणणे पित्याला पटवून देताना सतत वाद करून कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत असे, अर्थात त्यांचे एकेमकांवर विलक्षण प्रेम देखील होते. रणबीरचा जीवनाकडे पाहण्याचा, पित्याच्या प्रेमाला समजून घेण्याची परिपक्वता जीवनात झाल्यांनतर आली. वडील ऋषी कपूर यांच्या निधनानंतर रणबीर कपूर याच्यावर घराची जबाबदारी आली. मात्र, लग्नानंतर त्याला आणखीनच काही गोष्टींची माहिती होत गेली.


