Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Kalyan Murbad Accident: माळशेज घाटात काळाचा घाला! एसटी-स्कॉर्पिओची समोरासमोर धडक; 4 जणांचा मृत्यू, 3 गंभीर

Kalyan Murbad Accident: माळशेज घाटात काळाचा घाला! एसटी-स्कॉर्पिओची समोरासमोर धडक; 4 जणांचा मृत्यू, 3 गंभीर

Kalyan Murbad Accident: मुरबाड-माळशेजघाट महामार्गावरील वैशाखरे गावाजवळ आज दुपारी एक हृदयद्रावक घटना घडली आहे. भरधाव वेगाने येणारी एसटी बस आणि स्कॉर्पिओ गाडी यांच्यात झालेल्या भीषण समोरासमोर धडकेत 4 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात इतका भीषण होता की स्कॉर्पिओ गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, अपघातातील अन्य 3 जखमींची प्रकृती सध्या चिंताजनक आहे. त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अपघाताचा थरार आणि घटनाक्रम
मिळालेल्या माहितीनुसार, राज्य परिवहन मंडळाची (ST) बस मुरबाडकडून माळशेजच्या दिशेने जात होती. त्याच वेळी समोरून कल्याणच्या दिशेने जाणारी स्कॉर्पिओ गाडी वैशाखरे घाटात आली असता दोन्ही वाहनांची जोरात टक्कर झाली. घाटातील वळणावर वाहनांचा वेग जास्त असल्याने चालकांना नियंत्रण मिळवता आले नाही. स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले, परंतु गाडीचा चक्काचूर झाल्याने प्रवाशांना बाहेर काढताना मोठी कसरत करावी लागली.

मृत्यूचा सापळा बनलेला महामार्ग
कल्याण-मुरबाड-अहिल्यानगर हा नवीन रस्ता आता प्रवाशांसाठी मृत्यूचा सापळा ठरू लागला आहे. गेल्या काही दिवसांपासून या मार्गावर अपघातांचे सत्र सुरूच आहे. साधारण 20 दिवसांपूर्वी याच मार्गावरील रायते पुलावर झालेल्या भीषण अपघातात 11 जणांचा मृत्यू झाला होता. विशेष म्हणजे, ज्या दिवशी रायते पुलाचा अपघात झाला, त्याच दिवशी मुरबाडजवळ एका रिक्षाच्या अपघातात 2 जणांना आपले प्राण गमवावे लागले होते. या वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

अतिवेग आणि अवैध वाहतूक ठरतेय जीवघेणी
या महामार्गावरील अपघातांच्या मालिकेमागे अतिवेग आणि नियमांचे उल्लंघन ही प्रमुख कारणे असल्याचे समोर येत आहे. वेगमर्यादेचे नियम न पाळता वाहने चालवली जात असल्याने वळणांवर अपघात होत आहेत. तसेच, कल्याण स्टेशन परिसरातून मुरबाड, मानपाडा, मलंगड रोड आणि पडघा या भागांत धावणाऱ्या काळी-पिवळी आणि इको टॅक्सीमध्ये आजही क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची जीवघेणी वाहतूक सुरू असल्याचे विदारक चित्र आहे. स्थानिक प्रशासनाने आणि आरटीओ विभागाने यावर तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता नागरिक करत आहेत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!