Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Pune Water Crisis: पुणेकरांवर पाणीकपातीचे संकट; ‘या’ दिवसापासून शहरात दिवसाआड पाणीपुरवठा होण्याची शक्यता

Pune Water Crisis: पुणेकरांवर पाणीकपातीचे संकट; ‘या’ दिवसापासून शहरात दिवसाआड पाणीपुरवठा होण्याची शक्यता

Pune Water Crisis: पावसाळा तोंडावर आलेला असतानाच पुणेकरांच्या चिंतेत भर टाकणारी माहिती समोर आली आहे. हवामान विभागाने यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज वर्तवला असून, पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठाही झपाट्याने कमी होत आहे. त्यामुळे शहरावर पाणीकपातीचे सावट निर्माण झाले असून, महानगरपालिका प्रशासनाने आतापासूनच पाण्याच्या नियोजनासाठी महत्त्वाची पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

धरणांतील साठा घटला; प्रशासनाची वाढली चिंता

पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीत सध्या केवळ ५.७२ टीएमसी इतकाच पाणीसाठा उपलब्ध आहे. सध्याच्या वापराचा वेग कायम राहिल्यास हा साठा जुलैअखेरपर्यंतच पुरेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यातच यंदा सरासरीच्या ९० टक्क्यांपेक्षा कमी पावसाची शक्यता असल्याने प्रशासनाची चिंता आणखी वाढली आहे. या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठा विभागाने संभाव्य पाणीकपातीचे वेळापत्रक तयार केले असून, शहरात दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव पालिका आयुक्तांकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे.

पाणी बचतीसाठी मोठे नियोजन

महापालिकेच्या आकडेवारीनुसार, शहराला दरमहा सुमारे १.६० टीएमसी पाण्याची गरज भासते. पुढील तीन महिन्यांसाठी ही गरज ४.८० टीएमसी इतकी आहे. याशिवाय बाष्पीभवनासाठी १.८० टीएमसी आणि शेतीसाठी ०.८० टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे. उपलब्ध ५.७२ टीएमसी साठ्याच्या तुलनेत ही गरज मोठी असल्याने पाणी बचतीवर भर देण्यात येत आहे. दिवसाआड पाणीपुरवठ्याचा निर्णय लागू झाल्यास पुढील तीन महिन्यांत सुमारे १.४० टीएमसी पाण्याची बचत होऊ शकते, असा अंदाज प्रशासनाने व्यक्त केला आहे.

लोकप्रतिनिधींशी चर्चेनंतर होणार अंतिम निर्णय

पाण्याच्या सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी नुकतीच पाणीपुरवठा विभागाची तातडीची बैठक घेतली. या बैठकीत पाणी बचतीच्या विविध उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. नागरिकांना होणारा संभाव्य त्रास लक्षात घेऊन स्थानिक लोकप्रतिनिधींशी चर्चा केल्यानंतर पुढील आठवड्यात पाणीकपातीबाबत अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, प्रशासनाने नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले असून संभाव्य संकटाचा सामना करण्यासाठी सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!