Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

RBI Action: सहकार क्षेत्रात भूकंप! RBI कडून ‘या’ बँकेचे 7 संचालक बडतर्फ

RBI Action: सहकार क्षेत्रात भूकंप! RBI कडून ‘या’ बँकेचे 7 संचालक बडतर्फ

RBI Action: बँकिंग क्षेत्रातील नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) कडक कारवाईचा बडगा उगारला आहे. उस्मानाबाद जनता सहकारी बँकेच्या सात संचालकांना तातडीने पदावरून हटवण्याचे थेट आदेश आरबीआयने दिले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या निर्देशानंतर केंद्रीय बँकेने हे पाऊल उचलले असून, यामुळे महाराष्ट्रातील सहकार वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.

खंडपीठाच्या आदेशानंतर ‘आरबीआय’ची कारवाई
बँकिंग नियमन कायद्यातील अटी व शर्तींचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आली आहे. पिराजी बापूराव मंजुळे यांनी दाखल केलेल्या रिट याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने २ एप्रिल २०२६ रोजी यासंदर्भात महत्त्वपूर्ण आदेश दिले होते. न्यायालयाच्या निर्देशानुसार, रिझर्व्ह बँकेने संबंधित संचालकांना लेखी आणि प्रत्यक्षरीत्या आपली बाजू मांडण्याची संधी दिली होती. मात्र, संबंधित संचालकांनी कोणतेही अतिरिक्त पुरावे सादर केले नाहीत, तसेच ते सुनावणीलाही उपस्थित राहिले नाहीत. अखेर उपलब्ध कागदपत्रे आणि जुन्या निवेदनांचा आधार घेत आरबीआयच्या महाव्यवस्थापकांनी (General Manager) १ जून २०२६ रोजी संचालकांना बडतर्फ करण्याचा अंतिम निर्णय जाहीर केला.

वित्तीय क्षेत्रातील अन्य महत्त्वाच्या कारवाया:
१. १३५ नॉन-बँकिंग फायनान्स कंपन्यांवर बंदी
आरबीआयने देशातील वित्तीय शिस्त अधिक मजबूत करण्यासाठी आरबीआय कायदा १९३४ मधील कलम ४५-IA(६) चा वापर करत १३५ नॉन-बँकिंग फायनान्स कंपन्यांचे (NBFC) परवाने रद्द केले आहेत. तर दुसरीकडे, १३ कंपन्यांनी स्वतःहून आपले परवाने आरबीआयकडे सुपूर्द केले आहेत.

२. नाशिकमधील सहकारी बँकेवरील निर्बंध वाढवले
नाशिक जिल्ह्यातील निफाड येथील ‘लोकनेते आर. डी. (अप्पा) क्षीरसागर सहकारी बँक लिमिटेड’वरील निर्बंधांचा कालावधी आरबीआयने आणखी तीन महिन्यांसाठी वाढवला आहे. यापूर्वी १५ डिसेंबर २०२५ रोजी बँकेवर ६ महिन्यांसाठी निर्बंध लादण्यात आले होते, ज्यांची मुदत १६ जून रोजी संपत होती.

३. अमरावतीच्या मर्चंट्स बँकेला ५० हजारांचा दंड
संचालक आणि त्यांच्या नातेवाईकांना कर्ज देण्याबाबतच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ‘द अमरावती मर्चंट्स सहकारी बँक लिमिटेड’ला ५० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. बँकिंग नियमन कायदा १९४९ अंतर्गत आरबीआयने ४ जून रोजी हा आदेश जारी केला.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!