Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Maharashtra Rain Updates : राज्यातील 15 जिल्ह्यांना आज यलो अलर्ट; मुंबई, पुणे, रत्नागिरीसह अनेक भागांत मुसळधार पावसाचा इशारा

Maharashtra Rain Updates : राज्यातील 15 जिल्ह्यांना आज यलो अलर्ट; मुंबई, पुणे, रत्नागिरीसह अनेक भागांत मुसळधार पावसाचा इशारा

Maharashtra Rain Updates : राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून हवामान विभागाने आज राज्यातील 15 जिल्ह्यांना पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. मुंबई, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तर पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांसाठीही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

कोणत्या जिल्ह्यांना यलो अलर्ट?

हवामान विभागाच्या अंदाजानुसार खालील जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा जोर वाढू शकतो, मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, नाशिक, अहिल्यानगर, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, वर्धा, यवतमाळ तसेच विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार वारे आणि वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मुंबई-कोकणात पावसाचा जोर कायम

मुंबई आणि उपनगरांमध्ये दिवसभर ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे. ठाणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. घाटमाथा परिसरातही काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो.

तळकोकणात भात लावणीला सुरुवात

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मान्सूनच्या आगमनानंतर काही दिवस पावसाने विश्रांती घेतली असली, तरी शेतकऱ्यांनी भात लावणीच्या कामांना सुरुवात केली आहे. भाताच्या रोपांची लागवड उशिरा झाल्यास उत्पादनावर परिणाम होऊ शकतो, त्यामुळे नदीतील पाण्याचा वापर करून शेतकरी लागवड करत आहेत.

उदगीरमध्ये खरीप पेरणीला वेग

लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यात गेल्या काही दिवसांत झालेल्या समाधानकारक पावसानंतर खरीप हंगामातील पेरणीच्या कामांना गती मिळाली आहे. शेतकरी मोठ्या प्रमाणावर सोयाबीन, तूर, मूग, उडीद, बाजरी या पिकांची पेरणी करत आहेत. कृषी विभागाने हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन बियाणे आणि खतांचा योग्य वापर करण्याचे आवाहन केले आहे.

उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही सतर्कतेचा इशारा

नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांच्या काही भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांनाही यलो अलर्ट जारी करण्यात आला असून नागरिकांनी वीजांच्या कडकडाटादरम्यान आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

नागरिकांसाठी महत्त्वाच्या सूचना

विजांच्या कडकडाटावेळी झाडाखाली उभे राहू नका.
नदी, नाले आणि धबधब्यांच्या परिसरात जाणे टाळा.
शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज पाहूनच शेतीची कामे करावीत.
प्रवासादरम्यान स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!