Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

कोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाचा इशारा

कोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाचा इशारा

पुणे: राज्यात ठिकठिकाणी पाऊस पडत आहे. दरम्यान, कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचा पुढील दोन दिवस ऑरेंज अलर्ट आहे. तर मराठवाडा व विदर्भात पावसाचा यलो अलर्ट आहे. या दरम्यान अनेक जिल्ह्यांत विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह जोरदार, मध्यम स्वरूपाचा पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

मान्सूनच्या वाटचालीसाठी सध्या पोषक हवामान आहे. मान्सूनने सोमवारी अरबी समुद्र, बंगालचा उपसागर आणि श्रीलंकेचा बहुतांशी भाग व्यापला. तसेच दक्षिण अरबी समुद्राच्या आणखी काही भागांत तसेच मालदीव आणि कोमोरिन तसेच बंगालच्या उपसागराच्या काही भागांतही मान्सूनने प्रगती केली. पुढील २ ते ३ दिवसांत मान्सून दक्षिण अरबी समुद्राचा आणखी काही भाग, मालदीव आणि कोमोरिनचा उरलेला भाग आणि बंगालच्या उपसागराचा आणखी काही भाग व्यापण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला.

राज्यावर पावसाला अनुकूल असलेला कमी दाबाचा पट्टा कार्यरत आहे. कर्नाटकच्या किनारपट्टीलगत चक्राकार वाऱ्याची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. सोमवारी पुणे, महाबळेश्वर, नाशिक, सातारा, सोलापूर, धाराशीव, छत्रपती संभाजीनगर आदी भागांत पावसाची नोंद झाली.

राज्यातील काही भागांत पुढील पाच दिवस पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यांतही काही ठिकाणी वादळी पावसाचा यलो अलर्ट आहे. मध्य महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, अहिल्यानगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, जळगाव, धुळे, सोलापूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे.

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, हिंगोली, लातूर, धाराशीव, बीड जिल्ह्यात, तर नागपूर, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशीम, यवमाळ, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात विजा, ढगांच्या गडगडाटासह वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!