Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

दिवाळीपूर्वी सरकारची मुंबईकरांना मोठी भेट! दहिसर टोल नाका 2 किमी पुढे हलवणार

दिवाळीपूर्वी सरकारची मुंबईकरांना मोठी भेट! दहिसर टोल नाका 2 किमी पुढे हलवणार

Dahisar Toll Plaza: मुंबई आणि उपनगरातील लाखो प्रवाशांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. दैनंदिन वाहतूक कोंडीचे कारण ठरत असलेला दहिसर टोल प्लाझा लवकरच हलवला जाणार आहे. महाराष्ट्र सरकारने दिवाळीपूर्वी हा टोल त्याच्या सध्याच्या ठिकाणापासून 2 किलोमीटर पुढे हलवण्याचा निर्णय घेतला आहे.

का घेण्यात आला निर्णय?

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर असलेला दहिसर टोल प्लाझा दररोज वाहनचालकांसाठी डोकेदुखी बनला होता. येथे अनेकदा 30 ते 60 मिनिटांपर्यंत गाड्यांच्या रांगा लागत असल्याने नागरिकांचा मौल्यवान वेळ वाया जात होता. यामुळे इंधनाचा अपव्यय होत होता आणि प्रदूषणातही वाढ होत होती. मीरा-भाईंदर, दहिसर आणि ठाण्यातील सुमारे 15 लाख रहिवासी आणि मुंबईकडे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या समस्येला रोज सामोरे जावे लागत होते.

टोल कुठे हलवला जाणार?

सरकारच्या योजनेनुसार, हा टोल प्लाझा सध्याच्या ठिकाणाहून 2 किमी पुढे, वर्सोवा पुलाजवळील एका नर्सरी परिसरात हलवला जाईल. अधिकाऱ्यांच्या अंदाजानुसार हे काम पूर्ण करण्यास 1 ते 1.5 महिने लागतील. हा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीला स्थानिक आमदार, एमएसआरडीसी आणि एनएचएआयचे अधिकारी, पोलिस आयुक्त तसेच टोल ऑपरेटर कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.

दरम्यान, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, ‘सध्याचा टोल प्लाझा वाहतूक कोंडी आणि प्रदूषणाचे मुख्य कारण आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली यापूर्वी अनेक टोल रद्द करण्यात आले असून छोट्या वाहनांना सूट देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे दहिसर टोलची समस्या देखील संपवली जाणार आहे.’ आता हा प्रस्ताव केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडे मंजुरीसाठी पाठवला जाणार आहे. मंजुरी मिळताच कामाला गती मिळेल आणि दिवाळीपूर्वी प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!