Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Zubeen Garg Death: आसाम सरकार झुबीन गर्गच्या मृत्यूची चौकशी करणार; आयोजक आणि व्यवस्थापकाविरुद्ध FIR दाखल

Zubeen Garg Death: आसाम सरकार झुबीन गर्गच्या मृत्यूची चौकशी करणार; आयोजक आणि व्यवस्थापकाविरुद्ध FIR दाखल

Zubeen Garg Death: प्रसिद्ध गायक झुबिन गर्ग यांच्या अचानक निधनाची आसाम सरकार चौकशी करणार आहे. याबाबत आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांनी शनिवारी घोषणा केली. दरम्यान, ईशान्य भारत महोत्सवाचे आयोजक श्यामकानु महंता आणि गायकाचे व्यवस्थापक सिद्धार्थ शर्मा यांच्या विरोधात मोरीगाव पोलीस ठाण्यात FIR नोंदवण्यात आले आहेत. मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांना सांगितले की, ‘आसाम पोलीस झुबिन गर्ग यांच्या मृत्यूची सखोल चौकशी करतील. महंता, सिद्धार्थ शर्मा आणि त्यावेळी झुबिनसोबत असलेले इतर लोक यांचीही चौकशी केली जाईल. त्यांनी असेही स्पष्ट केले की, अपघाताच्या रात्री झुबिनला एका पार्टीत नेण्यात आले असल्याचे वृत्त आहे आणि ते सत्य आहे की नाही, याचा शोध घेतला जाईल.’

सिंगापूरमध्ये शुक्रवारी झुबिन गर्ग यांचा लाईफ जॅकेटशिवाय पोहताना मृत्यू झाला. मुख्यमंत्री म्हणाले, ‘सिंगापूर अधिकाऱ्यांनीही या घटनेची चौकशी सुरू केली आहे. जर काही गुन्हेगारी पैलू असल्यास, त्या देशाकडून माहिती मागवली जाईल. झुबिन आसाममधून गुप्त हेतूने नेले गेले असतील तर त्याचीही चौकशी होईल.’

शर्मा यांनी स्पष्ट केले की, राज्य सरकार या घटनेशी संबंधित सर्व पैलूंची निष्पक्ष चौकशी करेल. तसेच, कोणत्याही साक्षीदाराला मदत मिळेल आणि प्रकरणातील सर्व माहिती लोकांसमोर आणली जाईल. झुबिन गर्ग यांच्या निधनानंतर आसाम सरकारने तीन दिवसांचा राज्य शोक जाहीर केला आहे. मुख्य सचिव रवी कोटा यांनी सांगितले की, 20 ते 22 सप्टेंबर दरम्यान कोणतेही अधिकृत मनोरंजन किंवा औपचारिक कार्यक्रम होणार नाहीत. तथापि, आरोग्य शिबिरे, वृक्षारोपण मोहिमा आणि सेवा-केंद्रित उपक्रम सुरू राहतील.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!