Today मंगळवार, 21st एप्रिल 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

ठाणे महापालिका निवडणुकीत महायुतीत तणाव! भाजपकडून स्वबळावर लढवण्याची तयारी सुरु

ठाणे महापालिका निवडणुकीत महायुतीत तणाव! भाजपकडून स्वबळावर लढवण्याची तयारी सुरु

मुंबई: ठाणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी महायुतीत तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. शिवसेना शिंदे गटाने ठाणे महापालिकेत स्वबळावर महापालिका निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत. नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी यासाठी जोरदार मागणी केली आहे. काल आनंद आश्रम येथे झालेल्या बैठकीत शिवसेना पदाधिकाऱ्यांमध्ये भाजपबाबत नाराजीचा सूर उमटल्याचे दिसले.

दुसरीकडे, भाजपनेही ठाणे महापालिकेत स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केली आहे. भाजपच्या 18 प्रभागांमधील 416 इच्छुक उमेदवारांनी नुकतीच आयोजित कार्यशाळांमध्ये सहभाग घेतला. या बैठकीत उपस्थित पदाधिकाऱ्यांनी ‘अबकी बार 70 पार’ आणि ‘महापौर भाजपचाच होणार’ असा नारा दिला, यावरून भाजपची महापौर पदासाठी तयारी दृढ असल्याचे स्पष्ट होते. कार्यशाळेत आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, शहर अध्यक्ष संदीप लेले यांसह भाजप पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा –ठाकरे बंधूंसह मविआ नेते पुन्हा निवडणूक आयोगाची भेट घेणार; पण शरद पवार अनुपस्थित, नेमकं कारण काय?

शिवसेनेच्या विकासकामांमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांना अडथळे येत असल्याची तक्रारही करण्यात आली. विशेष म्हणजे, शिंदे गट आणि भाजपमध्ये काही प्रमाणात कोल्ड वॉर सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. शिवसेना खासदार नरेश म्हस्केंनी या तणावावर शहरातील नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना समजूत काढण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, भाजपने 33 प्रभागातील इच्छुक उमेदवारांसाठी स्वतंत्र शिबीर आयोजित केले असून, उमेदवारांची चाचपणी देखील केली जाणार आहे. काही दिवसांपूर्वी आमदार संजय केळकर यांनी महापौर पदासाठी भाजपची महत्त्वाकांक्षा व्यक्त केली होती. ठाणे महापालिकेतील आगामी निवडणूक आता महायुतीत तसेच भाजप स्वबळावर निवडणूक लढणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!