Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

श्रीरामपूरमध्ये काँग्रेस जिल्हाध्यक्षाचे अपहरण करून मारहाण; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तणाव वाढला

श्रीरामपूरमध्ये काँग्रेस जिल्हाध्यक्षाचे अपहरण करून मारहाण; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तणाव वाढला

Shrirampur Abduction Case: अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात आज सकाळी मोठा प्रकार घडला असून, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांचे अपहरण करून त्यांना मारहाण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पालिका निवडणुकांच्या तोंडावर राजकीय संघर्ष उफाळून आल्यानंतर आता हा प्रकार प्रत्यक्ष हिंसाचारात परिवर्तित झाल्याचे स्पष्ट होत आहे. घटनेनंतर काँग्रेसने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली असून गुन्हेगारांना तत्काळ अटक करण्याची मागणी करण्यात येत आहे.

मॉर्निंग वॉकदरम्यान अपहरण

सचिन गुजर आज सकाळी नेहमीप्रमाणे सातच्या सुमारास सकाळच्या मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडले होते. त्याचवेळी त्यांना दोन व्यक्तींनी जबरदस्तीने गाडीत ओढून नेल्याचा आरोप करण्यात आला आहे. काही तासांनी मारहाण झालेल्या अवस्थेत त्यांना रस्त्याच्या कडेला सोडून देण्यात आले.

अपहरणकर्त्यांचा हिंदुत्ववादी गटाशी संबंध?

या घटनेत सहभागी असलेले काही संशयित हिंदुत्ववादी संघटनेशी संबंधित असल्याचा आरोप समोर आला आहे. अपहरण आणि नंतर झालेल्या मारहाणीचे काही क्षण परिसरातील CCTV कॅमेऱ्यात कैद झाल्याचं सांगण्यात येत आहे. फुटेजच्या आधारे आरोपींची ओळख पटवण्याचे प्रयत्न पोलीस करत आहेत. प्रकरणाची माहिती मिळताच काँग्रेसचे कार्यकर्ते, आमदार हेमंत ओगले, तसेच गुजर यांचे कुटुंबीय तात्काळ श्रीरामपूर पोलीस ठाण्यात दाखल झाले. या घटनेची गंभीरता लक्षात घेता गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करण्यात आली आहे.

हेही वाचा – अहिल्यानगर हळहळलं..! सख्ख्या भाऊ-बहिणीचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय घडलं?

निवडणूक पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण पेटले

पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आधीच आरोप–प्रत्यारोपांचा जोर सुरू असताना, जिल्हाध्यक्षांच्या अपहरणाच्या घटनेने शहरातील राजकीय वातावरण अधिक तापण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या हल्ल्यामागे विरोधी गटाचा सहभाग असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात येत आहे. पोलीस संपूर्ण प्रकरणाचा तपास करत असून, CCTV फुटेज आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे संशयितांचा शोध सुरू आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!