Today मंगळवार, 26th मे 2026
Breaking News
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

बीड जिल्ह्यात हृदयद्रावक घटना! वडिलांच्या मृत्यूनंतर 3 वर्षांच्या मुलीचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडला

बीड जिल्ह्यात हृदयद्रावक घटना! वडिलांच्या मृत्यूनंतर 3 वर्षांच्या मुलीचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडला

बीड: जिल्ह्यातील इमामापूर रोड परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गावकऱ्यांना हादरवून टाकणाऱ्या या घटनेत एका तीन वर्षांच्या चिमुरडीचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. तिचे ओठ गडद निळे-काळे झाल्याने गुदमरल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे फक्त दोन दिवसांपूर्वीच तिच्या वडिलांचा, जयराम बोराडे, मृतदेह त्याच परिसरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला होता.

मुलगी बेपत्ता, मृतदेह आढळल्याने गूढ वाढले

वृत्तानुसार, बोराडे आपल्या मुलीसह घराबाहेर पडले होते. त्यानंतर मुलगी बेपत्ता असल्याने शोधमोहीम राबवली जात होती. दुर्दैवाने, आज सकाळी तिचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत सापडला. त्यामुळे या दोन मृत्यूंच्या घटनांमध्ये काय संबंध आहे, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

तपास सुरु

प्राथमिक निरीक्षणांनुसार वडिलांचा मृत्यू आत्महत्या असल्याचे दिसत असले तरी, चिमुरडीचा मृतदेह आढळल्यानंतर परिस्थिती अधिक गुंतागुंतीची बनली आहे. पोलिसांनी यामागे घातपात, जबरदस्तीने फाशी देण्याची शक्यता किंवा वडिलांच्या मृत्यूशी असलेला संभाव्य संबंध तपासायला सुरुवात केली आहे. ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून चौकशी सुरू केली आहे.

गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

सलग दोन दिवसांत एकाच कुटुंबातील दोन सदस्यांचे मृतदेह एकाच परिसरात सापडल्याने गावकऱ्यांमध्ये भीती व संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेमागील खरे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!