Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Jalgaon News: नव्या संसाराला लागली दृष्ट! लग्नानंतर 20 दिवसांतच नववधूचा दुर्दैवी अंत; नेमकं काय घडलं?

Jalgaon News: नव्या संसाराला लागली दृष्ट! लग्नानंतर 20 दिवसांतच नववधूचा दुर्दैवी अंत; नेमकं काय घडलं?

Jalgaon News: नियतीचा खेळ अत्यंत क्रूर असतो, याचाच प्रत्यय जळगाव जिल्ह्यात आला आहे. ज्या हातांवरील लग्नाची मेहंदी अजून नीट पूसली नव्हती, त्याच नवविवाहितेला काळाने कायमचे हिरावून घेतले. जळगाव जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या सूर्याच्या प्रकोपाने (Heat Wave) एका २० वर्षीय नवविवाहितेचा बळी घेतल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. वैशाली सुनील भील असे या दुर्दैवी तरुणीचे नाव असून, लग्नानंतर अवघ्या २० दिवसांतच तिने जगाचा निरोप घेतल्याने जामनेर आणि चोपडा तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

लग्नाची धामधूम ठरली जीवघेणी?
वैशाली यांचा विवाह २३ मे २०२६ रोजी मोहाडी (ता. जामनेर) येथील सुनील भील यांच्याशी मोठ्या थाटामाटात झाला होता. संसाराचे नवे पायंडा रचत असतानाच, ११ मे रोजी त्या पतीसह नातेवाईकांच्या लग्नासाठी चोपडा तालुक्यातील खामखेडा येथे गेल्या होत्या. भर उन्हात केलेला हा प्रवास आणि लग्नातील दगदग त्यांच्या जीवावर बेतली.

चक्कर आली अन्… वाटेतच प्राणज्योत मालवली
लग्नाचा सोहळा आटोपून घरी परतल्यावर वैशाली यांना प्रचंड थकवा जाणवत होता. दुपारी २ च्या सुमारास अचानक अंगात ताप भरला आणि त्या भोवळ येऊन खाली कोसळल्या. कुटुंबीयांनी तातडीने त्यांना नेरी येथील ग्रामीण रुग्णालयात नेले, मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी जळगाव शासकीय रुग्णालयात हलवण्यास सांगण्यात आले. दुर्दैवाने, जळगावला पोहोचण्यापूर्वीच वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली.

जिल्ह्यात उन्हाचा तडाखा; अमळनेरमध्ये पुजाऱ्याचाही मृत्यू
उष्माघाताचा धोका केवळ वैशालीपुरता मर्यादित राहिला नाही. अमळनेर बसस्थानकावर बसची वाट पाहत असताना बहादरपूर येथील पुजारी प्रभाकर जोशी यांचाही अचानक चक्कर येऊन जागीच मृत्यू झाला. या दोन्ही घटनांमुळे जिल्ह्यात मे हिटची दाहकता किती भयानक आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!