Ajit Pawar Dashkriya Vidhi: महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतरच्या धार्मिक विधींबाबत सुरू असलेल्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. अजितदादांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांनी जाहीर केले आहे की, परंपरेनुसार होणारा ‘दशक्रिया विधी’ किंवा १३ व्या दिवसाचा कोणताही सार्वजनिक कार्यक्रम आयोजित केला जाणार नाही.
कौटुंबिक निर्णय: विधी आटोपले
अजितदादांच्या निधनानंतर संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्या अंत्यविधीच्या पुढील विधींच्या प्रतीक्षेत होता. मात्र, श्रीनिवास पवार यांनी यामागची स्पष्ट भूमिका मांडली आहे. अजित पवारांच्या अस्थि विसर्जनाच्या वेळीच आवश्यक असलेले सर्व धार्मिक विधी पार पडले आहेत. यामुळे ६ फेब्रुवारीला होणारा दहाव्याचा विधी किंवा उत्तरकार्याचा कोणताही मोठा कार्यक्रम होणार नाही. हा निर्णय पवार कुटुंबीयांनी एकत्रितपणे घेतला असून, याबाबत सुनेत्रा पवार किंवा पार्थ-जय पवार यांनी स्वतंत्रपणे कोणतेही भाष्य केलेले नाही.
अध्यक्षपदासाठी सुनेत्रा पवारांच्या नावाची चर्चा
एककीडे पवार कुटुंबीय या दुःखातून सावरत असताना, दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) ‘वारसदार’ कोण, यावर खलबतं सुरू झाली आहेत. पक्षातील बहुतांश आमदार आणि पदाधिकाऱ्यांनी सुनेत्रा पवार यांनीच राष्ट्रीय अध्यक्षपदाची कमान हाती घ्यावी, अशी आग्रही मागणी केली आहे. दरम्यान, प्रफुल्ल पटेल यांचे नाव अध्यक्षपदासाठी चर्चेत आले होते, परंतु त्यांनी स्वतः या बातम्यांचे खंडन केले आहे. “अद्याप कोणताही अधिकृत निर्णय झालेला नाही,” असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.


