Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

ट्रक क्लिनर अपहरण प्रकरणात दिलीप खेडकर यांना मोठा दिलासा; अटकपूर्व जामीन मंजूर

ट्रक क्लिनर अपहरण प्रकरणात दिलीप खेडकर यांना मोठा दिलासा; अटकपूर्व जामीन मंजूर

Pune News: वादग्रस्त ट्रक क्लिनर अपहरण प्रकरणात फरार असलेल्या निवृत्त आयएएस अधिकारी दिलीप खेडकर यांना अखेर मुंबई उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणात खेडकर आणि त्यांच्या अंगरक्षकावर आरोप आहे की त्यांनी 22 वर्षीय ट्रक क्लिनर प्रल्हाद कुमार याला मारहाण करून जबरदस्तीने गाडीत बसवले.

काय आहे नेमकं प्रकरण?

दरम्यान, 12 सप्टेंबरला, नवी मुंबईतील मुलुंड-आयरोली लिंक रोडवर प्रल्हाद कुमारच्या काँक्रीट मिक्सर ट्रकने खेडकर यांची लँड क्रूझर गाडी धक्का दिला. या घटनेनंतर संतापलेल्या खेडकर आणि त्यांच्या अंगरक्षकाने प्रल्हाद कुमार याला मारहाण करत गाडीत बसवले आणि पोलिस ठाण्यात नेतो असे सांगितले. तथापी, 14 सप्टेंबरला, प्रल्हाद कुमारला पोलिसांनी सुरक्षित सोडवले. त्यानंतर खेडकर फरार झाले होते. 6 ऑक्टोबरला त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता.

हेही वाचा –Manorama Khedkar: मनोरमा खेडकर पुन्हा फरार; बंगल्यावर चिकटवलेली नोटीस फाडली

याशिवाय, दिलीप खेडकर यांच्या पत्नी मनोरमा खेडकर यांच्यावरही पोलिस तपासात अडथळा निर्माण केल्याचा आरोप आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, नोटीस बजावूनही त्यांनी चौकशीसाठी सहकार्य केले नाही. 6 वाजल्यानंतर हजर झाल्याने कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप न्यायालयात नोंदवण्यात आला. मनोरमा खेडकर यांना 15 दिवसांपूर्वी स्थानिक न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला होता, मात्र याबाबत पोलिसांकडे माहिती नव्हती.

तथापी, मनोरमा खेडकर यांच्यावर पुण्यातील चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात बनावट कागदपत्रांच्या आधारे मालमत्तेवर कब्जा मिळवण्याचे गुन्हे दाखल आहेत. तसेच, शासकीय अधिकाऱ्यांशी उर्मट वर्तन केल्याच्या तक्रारीही नोंदवल्या आहेत. या सगळ्यामुळे खेडकर कुटुंब पुन्हा चर्चेत आले आहेत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!