Today शुक्रवार, 3rd जुलै 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Ashok Kharat Case: ‘चंद्रकांत पाटलांना मुख्यमंत्री व्हायचे होते, म्हणून खरातकडून अघोरी पूजा केली…’; काँग्रेस नेत्याचा खळबळजनक दावा

Ashok Kharat Case: ‘चंद्रकांत पाटलांना मुख्यमंत्री व्हायचे होते, म्हणून खरातकडून अघोरी पूजा केली…’; काँग्रेस नेत्याचा खळबळजनक दावा

Ashok Kharat case: नाशिकचा वादग्रस्त भोंदूबाबा अशोक खरात याच्या प्रकरणाने आता राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सोशल मीडियावर एक स्फोटक पोस्ट शेअर करत थेट भाजप नेत्यांवर निशाणा साधला आहे. “मंत्री चंद्रकांत पाटील यांना मुख्यमंत्री व्हायचे होते, त्यासाठी त्यांनी या भोंदूबाबाकडून अघोरी विधी करून घेतले,” असा खळबळजनक आरोप सपकाळ यांनी केला आहे.

डझनभर मंत्री अन् दोन डझन अधिकारी जेलमध्ये जाणार?
हर्षवर्धन सपकाळ यांनी या प्रकरणाला ‘ब्लॅकमेलिंग’चे राजकारण म्हटले आहे. जर सरकारने या प्रकरणाचा प्रामाणिक तपास केला, तर सध्याच्या मंत्रिमंडळातील किमान १२ मंत्री आणि २४ बडे अधिकारी तुरुंगात जातील, असा दावा सपकाळ यांनी केला आहे. २०१८ मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना खरातच्या ईशान्येश्वर मंदिराला १.५ कोटी रुपयांचा सरकारी निधी देण्यात आला होता. तसेच फडणवीस कार्यालयातील तत्कालीन अधिकारी मिलिंद बोरीकर यांचेही या बाबाशी निकटचे संबंध असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

फडणवीसांना ६ महिन्यांपूर्वीच होती माहिती?
सपकाळ यांच्या मते, देवेंद्र फडणवीस यांना या अघोरी कृत्यांची कल्पना गेल्या सहा महिन्यांपासून होती. “परंतु, जेव्हा फडणवीसांना समजले की त्यांचेच काही सहकारी आणि मित्रपक्षातील नेते त्यांचे मुख्यमंत्रीपद घालवण्यासाठी खरातकडून तंत्र-मंत्र करत आहेत, तेव्हाच त्यांनी कारवाईचा बडगा उगारला,” असा आरोप काँग्रेसने केला आहे. आता या भोंदूबाबाच्या माध्यमातून फडणवीस आपल्याच पक्षातील हितशत्रूंना ब्लॅकमेल करत असल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केला.

नरबळीचा संशय आणि पोलीस कोठडी
अशोक खरातला नाशिक सत्र न्यायालयात हजर केले असता, सरकारी वकिलांनी धक्कादायक माहिती दिली. खरातने पाच नरबळी दिल्याचा दाट संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणाच्या सखोल तपासासाठी न्यायालयाने त्याला ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!