Today सोमवार, 3rd ऑगस्ट 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Monsoon 2026 : ताशी 70 किमी वेगाने सोसाट्याचा वारा अन् विजांचा कडकडाट; पुढचे 72 तास महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचे

Monsoon 2026 : ताशी 70 किमी वेगाने सोसाट्याचा वारा अन् विजांचा कडकडाट; पुढचे 72 तास महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचे

Monsoon 2026 : राज्यात गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या प्रचंड उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले असतानाच हवामान विभागाकडून दिलासादायक अंदाज समोर आला आहे. अरबी समुद्रात मान्सूनची गती वाढली असून, येत्या १० जूनपर्यंत तो महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईसह राज्यातील अनेक भागांत लवकरच पावसाची हजेरी लागण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, या आनंदाच्या बातमीसोबतच हवामान खात्याने यंदाच्या पावसाच्या स्वरूपाबाबत सावधगिरीचाही इशारा दिला आहे.

राज्यात मान्सूनपूर्व पावसाची जोरदार एंट्री

मुख्य मान्सून अद्याप राज्यात पोहोचलेला नसला, तरी त्याआधीच मान्सूनपूर्व पावसाने अनेक भागांना झोडपायला सुरुवात केली आहे. कोकण किनारपट्टी, घाटमाथा आणि पश्चिम महाराष्ट्रात वातावरण ढगाळ झाले असून, वादळी वाऱ्यांसह जोरदार सरी कोसळत आहेत. हवामान विभागाच्या माहितीनुसार, २६ मेदरम्यान राज्यातील अनेक भागांत ताशी ६० ते ७० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.

पुढील तीन दिवस हवामानाचा तडाखा

पुढील ७२ तास कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रासाठी महत्त्वाचे मानले जात आहेत. काही जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात निर्माण झालेल्या अनुकूल परिस्थितीमुळे मान्सूनला अधिक बळ मिळत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे किनारपट्टी भागात समुद्र खवळलेला राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

मान्सूनची देशभरात आगेकूच

अंदमान-निकोबार परिसर पार केल्यानंतर मान्सूनचे वारे आता वेगाने भारतीय मुख्य भूभागाकडे सरकत आहेत. हवामानातील सकारात्मक बदलांमुळे दक्षिण भारतातून पुढे सरकत मान्सून महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्येही वेळेआधी पोहोचू शकतो, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

‘अल निनो’मुळे वाढली चिंता

मान्सूनच्या आगमनाची शक्यता उत्साहवर्धक असली, तरी ‘अल निनो’ या जागतिक हवामान परिणामामुळे पावसात अनियमितता राहण्याची भीती व्यक्त होत आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, जून महिन्यात अपेक्षेपेक्षा कमी म्हणजेच सरासरीच्या सुमारे ८० टक्के पाऊस पडू शकतो. सुरुवातीला दमदार पाऊस झाल्यानंतर जूनच्या मध्यावर पावसाचा खंड पडण्याची शक्यता आहे.

शेतकऱ्यांना सावधगिरीचा सल्ला

कृषी तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना पहिल्या पावसावर लगेच पेरणी न करण्याचा सल्ला दिला आहे. सुरुवातीच्या सरींनंतर पाऊस थांबल्यास बियाणे वाया जाण्याचा आणि दुबार पेरणीचा आर्थिक फटका बसू शकतो. त्यामुळे हवामानाचा स्थिर अंदाज मिळेपर्यंत घाईगडबडीत शेतीची कामे न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!