Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Narhari Zirwal: ‘त्या प्रकरणात दोषी आढळलो तर राजीनामा देईन…’; नरहरी झिरवळ यांचे मोठे वक्तव्य

Narhari Zirwal: ‘त्या प्रकरणात दोषी आढळलो तर राजीनामा देईन…’; नरहरी झिरवळ यांचे मोठे वक्तव्य

Narhari Zirwal: मंत्रालयातील अन्न व औषध प्रशासन विभागात झालेल्या लाचखोरीच्या कारवाईला आता मोठे राजकीय वळण मिळाले आहे. अटक करण्यात आलेला लिपिक राजेंद्र ढेरंगे याने, मंत्र्यांचे खाजगी सचिव (PS) रामदास गाडे यांच्या सांगण्यावरूनच लाच मागितली, अशी धक्कादायक कबुली दिल्याने खळबळ उडाली आहे. या आरोपांनंतर मंत्री नरहरी झिरवळ यांनी थेट राजीनामा देण्याची तयारी दर्शवत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

नेमका आरोप काय?
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) केलेल्या चौकशीत आरोपी ढेरंगेने तपासाची दिशा मंत्र्यांच्या दालनाकडे वळवली आहे. मंत्र्यांचे पीएस रामदास गाडे यांच्यासाठीच हे पैसे गोळा केले जात असल्याचा दावा आरोपीने केल्याने आता तपासाची व्याप्ती वाढली आहे.

नरहरी झिरवळ यांचे प्रत्युत्तर
या गंभीर आरोपानंतर मंत्री झिरवळ यांनी आपली बाजू मांडली. ते म्हणाले की, ‘या प्रकरणात माझी किंवा माझ्या कार्यालयाची ‘लिंक’ प्रत्यक्षपणे सिद्ध झाली, तर मी एका मिनिटात मंत्रीपदाचा राजीनामा देईन. मी इतका मोठा नाही की मला कोणी टार्गेट करेल, पण सत्याची चौकशी व्हावी. विभागात असा प्रकार घडणे चुकीचेच आहे, त्याची नैतिक जबाबदारी मी नाकारत नाही. पण गुन्हेगाराला पाठीशी घालण्याचा प्रश्नच येत नाही. कायद्यानुसार त्याला जाब द्यावाच लागेल.’ तथापी, मंत्रालयातील दालन सील केल्याच्या अफवांचे त्यांनी खंडन केले असून, कार्यालय नियमित सुरू असल्याचे स्पष्ट केले.

हेही वाचा – सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्हा नियोजन समितीची पहिली बैठक; 1037 कोटींच्या विकास आराखड्यावर चर्चा

मुख्यमंत्र्यांच्या दरबारी दाद मागणार
या प्रकरणात पीएसचे नाव गोवल्या गेल्याने प्रशासन बॅकफूटवर आले आहे. नरहरी झिरवळ यांनी सांगितले की, ते तातडीने मुंबईत दाखल होऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतील. मुख्यमंत्र्यांशी सविस्तर चर्चा करून या प्रकरणाचा छडा लावण्याची विनंती करणार आहे, असेही त्यांनी नमूद केले.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!