Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Palghar Truck Accident: पालघरमध्ये लग्नाच्या वऱ्हाडावर काळाचा घाला! ट्रक-कंटेनरची समोरासमोर धडक; 12 जणांचा जागीच अंत

Palghar Truck Accident: पालघरमध्ये लग्नाच्या वऱ्हाडावर काळाचा घाला! ट्रक-कंटेनरची समोरासमोर धडक; 12 जणांचा जागीच अंत

Palghar Truck Accident: पालघर जिल्ह्यातील धानीवरी येथे काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या एका ट्रकची कंटेनरशी जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात प्राथमिक माहितीनुसार १२ जणांचा जागीच मृत्यू झाला असून, मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

अपघाताच्या वेळी ट्रकमध्ये १०० पेक्षा जास्त वऱ्हाडी प्रवास करत होते. सुमारे २० ते २५ जण या अपघातात गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर कासा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. लग्नाच्या आनंदात असलेल्या कुटुंबावर या अपघातामुळे दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

हिंगोली: ट्रॅक्टर कालव्यात कोसळून २० वर्षीय तरुणाचा अंत
दुसऱ्या एका घटनेत हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील फाटा गाव परिसरात एका तरुणाला शेताकडे जाताना मृत्यूने गाठले. ज्ञानेश्वर कदम (वय २०) हा तरुण पहाटे साडेचारच्या सुमारास ट्रॅक्टर-ट्रॉली घेऊन शेताकडे निघाला होता. अंधार आणि रस्त्याचा अंदाज न आल्याने त्याचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटले आणि वाहन थेट रस्त्याच्या बाजूला असलेल्या कालव्यात कोसळले. या अपघातात ट्रॅक्टरखाली दबले गेल्याने ज्ञानेश्वरचा जागीच मृत्यू झाला.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!