Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; माती-गाळ मिळणार मोफत, रॉयल्टीसह विविध शुल्कांमध्येही सवलत

पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; माती-गाळ मिळणार मोफत, रॉयल्टीसह विविध शुल्कांमध्येही सवलत

Flood Relief Decision: राज्यातील अतिवृष्टी व पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून दिलासादायक निर्णय जाहीर करण्यात आला आहे. अतिवृष्टीमुळे वाहून गेलेल्या किंवा खोल खड्डे पडलेल्या शेतजमिनींच्या पुनर्वसनासाठी मोफत माती, गाळ, मुरूम आणि कंकर उपलब्ध करून देण्याचे आदेश महसूल विभागाने दिले आहेत. जमिनींची सुपीकता पुन्हा सुधारण्यासाठी या खनिजांवरील रॉयल्टीही माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारने हा निर्णय तत्काळ अंमलात आणावा, असे निर्देश राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले असून, त्यामुळे पूरग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

अनेक जिल्ह्यांत शेती उद्ध्वस्त

ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या प्रचंड पावसाने राज्यातील सुमारे 30 जिल्ह्यांना मोठा फटका बसला. महापूर आणि जोरदार पावसामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून लाखो हेक्टरवरील खरीप पिके नष्ट झाली आहेत. सोलापूरसह अनेक जिल्ह्यांत नद्यांनी दिशा बदलल्याने शेतजमिनी वाहून गेल्या, तर अनेक ठिकाणी 10 ते 15 फुट खोल खड्डे पडल्याचे निदर्शनास आले.

कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या दोन महिन्यांत राज्यातील 1,785,714 हेक्टर (4,284,846 एकर) क्षेत्र अतिवृष्टीमुळे बाधित झाले आहे. सोयाबीन, कापूस, मका, तूर, उडीद, मूग, भाजीपाला, फळपिके, ऊस, कांदा, ज्वारी आणि हळद या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

हेही वाचा – पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना प्रवीण तरडेंनी दिला मदतीचा हात; पुण्यात MPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी केलं ‘हे’ काम

या जिल्ह्यांना सर्वाधिक फटका

नांदेड – 728,049 हेक्टर

यवतमाळ – 318,860 हेक्टर

वाशीम – 203,098 हेक्टर

अकोला – 177,466 हेक्टर

धाराशिव – 157,610 हेक्टर

बुलढाणा – 89,782 हेक्टर

सोलापूर – 47,266 हेक्टर

एकूण 195 तालुके आणि 654 महसूल मंडळांमध्ये खरीप पिकांची मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!