Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

मोठी बातमी! अजित पवारांनी स्वीकारला कोकाटेंचा राजीनामा, अटकेसाठी नाशिक पोलीस मुंबईत दाखल

मोठी बातमी! अजित पवारांनी स्वीकारला कोकाटेंचा राजीनामा, अटकेसाठी नाशिक पोलीस मुंबईत दाखल

Manikrao Kokate News: सदनिका घोटाळा प्रकरणात कायदेशीर कचाट्यात सापडलेले माजी क्रीडामंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते माणिकराव कोकाटे यांना अखेर मंत्रिमंडळातून पायउतार व्हावे लागले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोकाटेंचा राजीनामा स्वीकारून तो पुढील कार्यवाहीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला आहे.

कायदे आणि नियम व्यक्तीपेक्षा मोठे – अजित पवार

माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा दिल्यानंतर अजित पवारांनी ट्विट करत पक्षाची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, न्यायालयाच्या निकालानंतर कोकाटे यांनी स्वतःहून पदत्याग केला आहे. आमचा पक्ष नेहमीच घटनात्मक नैतिकता आणि न्यायपालिकेचा सन्मान करत आला आहे. नियम हे कोणाही व्यक्तीपेक्षा श्रेष्ठ आहेत, याच तत्त्वातून आम्ही हा राजीनामा स्वीकारला आहे.

हेही वाचा – Manikrao Kokate: मोठी बातमी! माणिकराव कोकाटेंना रुग्णालयातूनचं अटक करणार? नाशिक पोलिसांच्या हालचालींना वेग

नाशिक पोलिस मुंबईत दाखल

दुसरीकडे, कोकाटे यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. नाशिक सत्र न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा कायम ठेवल्यानंतर आणि कनिष्ठ न्यायालयाने अटक वॉरंट बजावल्यानंतर नाशिक पोलिसांचे एक पथक मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहे. कोकाटे सध्या मुंबईत असल्याने त्यांना कोणत्याही क्षणी ताब्यात घेतले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!