Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Rohit Pawar: ’90 लाख मतदार वगळून बंगाल काबीज केला…’; विजयाच्या जल्लोषादरम्यान भाजपवर रोहित पवारांचा हल्लाबोल

Rohit Pawar: ’90 लाख मतदार वगळून बंगाल काबीज केला…’; विजयाच्या जल्लोषादरम्यान भाजपवर रोहित पवारांचा हल्लाबोल

Rohit Pawar: तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या धक्कादायक निकालांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी भाजपला खडे बोल सुनावले आहेत. “भाजपने सत्तेच्या उन्मादात लोकशाहीचा गळा घोटू नये,” असे म्हणत त्यांनी निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

विजयासाठी ‘SIR’ चा वापर केल्याचा गंभीर आरोप
रोहित पवार यांनी या विजयामागील ‘इनसाईड स्टोरी’ सांगताना भाजपच्या रणनीतीवर निशाणा साधला. ते म्हणाले, “गृहमंत्री अमित शाह यांनी १५ दिवस बंगालमध्ये तळ ठोकून यंत्रणा राबवली. SIR च्या नावाखाली तब्बल ९० लाख मतदारांना यादीतून बाहेर काढले गेले. ही लोकशाहीची हत्या असून अशा प्रकारे मतदारांना डावलून विजयाचा मार्ग मोकळा करण्यात आला आहे.”

महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांनी ‘अँटी-इन्कमबन्सी’ लक्षात ठेवावी
बंगालच्या निकालाने हुरळून गेलेल्या महाराष्ट्रातील नेत्यांना पवारांनी वास्तवाची जाणीव करून दिली आहे. “ज्या ‘अँटी-इन्कमबन्सी’चा (सत्तेविरोधी लाट) फटका तामिळनाडू आणि बंगालमध्ये बसला, तशीच लाट आज महाराष्ट्र आणि केंद्रातही आहे. जर आज निवडणुका झाल्या, तर जनता या सत्ताधाऱ्यांनाही सत्तेबाहेर फेकल्याशिवाय राहणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला.

निकाल आधीच तोडफोड
निवडणुकीचे अंतिम निकाल स्पष्ट होण्यापूर्वीच बंगालमध्ये सुरू झालेल्या हिंसाचाराचा रोहित पवारांनी तीव्र निषेध केला. “भाजप कार्यकर्त्यांनी निकाल पूर्ण लागण्याआधीच तृणमूल काँग्रेसच्या कार्यालयांवर हल्ले आणि तोडफोड सुरू केली आहे. हे भाजपच्या भविष्यातील ‘दहशतीच्या’ कारभाराचे संकेत आहेत का? जनतेला आता पुढे काय काय भोगावे लागेल याची धास्ती वाटते,” असे ते म्हणाले.


लोकशाही संकटात!
सत्तेच्या जोरावर विरोधकांवर हल्ले करणे आणि मतदारांना डावलणे ही घातक प्रवृत्ती असल्याचे पवारांनी नमूद केले. भाजपची ही ‘राजकीय संस्कृती’ देशाला हुकूमशाहीकडे घेऊन जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी यावेळी केला.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!