Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Satara ZP Election: साताऱ्यात राडा! मंत्री शंभूराज देसाईंना धक्काबुक्की; भाजपच्या विजयानंतर महायुतीत वादाची ठिणगी

Satara ZP Election: साताऱ्यात राडा! मंत्री शंभूराज देसाईंना धक्काबुक्की; भाजपच्या विजयानंतर महायुतीत वादाची ठिणगी

Satara ZP Election: सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अत्यंत नाट्यमय घडामोडी घडल्या असून, सत्तेच्या या रणसंग्रामात महायुतीमधील मित्रपक्षांमध्येच जुंपल्याचे पाहायला मिळाले. भाजपच्या उमेदवार प्रिया शिंदे यांनी अवघ्या एका मताच्या फरकाने विजय मिळवला असला, तरी या निवडीदरम्यान झालेल्या राड्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांना पोलिसांच्या उपस्थितीत धक्काबुक्की झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला असून, शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपमधील संघर्ष आता टोकाला पोहोचला आहे. सत्ता स्थापनेसाठी भाजपने पोलिसी बळाचा गैरवापर केल्याचा आरोप शिंदे गटाकडून केला जात आहे.

या निवडणुकीत संख्याबळाची जुळवाजुळव करताना मोठी पळापळ पाहायला मिळाली. मतदानाच्या ऐनवेळी शिंदे गटाच्या दोन सदस्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने शिवसेनेच्या गोटात तीव्र संताप व्यक्त होत आहे. “ही लोकशाही मार्गानं झालेली निवडणूक आहे की सत्तेच्या जोरावर केलेली जबरदस्ती?” असा सवाल उपस्थित करत शिवसैनिकांनी भाजपवर टीकेची झोड उठवली आहे. आपल्याच मित्रपक्षाच्या मंत्र्याला धक्काबुक्की होणे आणि सदस्यांना ताब्यात घेऊन मतदानावर प्रभाव टाकणे, हा प्रकार म्हणजे शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसण्यासारखा असल्याची भावना स्थानिक नेत्यांनी व्यक्त केली आहे. या प्रकारामुळे साताऱ्यात महायुतीमधील दरी अधिक रुंदावण्याची चिन्हे दिसत आहेत.

निवडणुकीच्या निकालात भाजपच्या प्रिया शिंदे यांना ३३ मते मिळाली, तर त्यांच्या प्रतिस्पर्धी मनीषा फडतरे यांना ३२ मते पडली. अवघ्या एका मताने मिळालेल्या या विजयावर आता वादाचे सावट निर्माण झाले आहे. जिल्हा परिषदेच्या एकूण रचनेत भाजप २७ जागांसह मोठा पक्ष होता, तर राष्ट्रवादी २० आणि शिंदे गटाकडे १५ जागा होत्या. मात्र, आजच्या राड्याने आणि मतदानाच्या प्रक्रियेत झालेल्या हस्तक्षेपामुळे शिवसेनेच्या गोटात कमालीची अस्वस्थता आहे. साताऱ्यातील हा ‘हाय-व्होल्टेज’ ड्रामा भविष्यात राज्याच्या राजकारणावर काय परिणाम करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!