Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Nitesh Rane: नितेश राणेंना न्यायालयाचा झटका! ‘या’ प्रकरणात एका महिन्याचा कारावास, पण तूर्तास…

Nitesh Rane: नितेश राणेंना न्यायालयाचा झटका! ‘या’ प्रकरणात एका महिन्याचा कारावास, पण तूर्तास…

Nitesh Rane: गेल्या सहा वर्षांपासून राजकीय वर्तुळात चर्चेत असलेल्या ‘चिखलफेक’ प्रकरणाचा अखेर निकाल लागला आहे. सार्वजनिक शांततेचा भंग केल्याचा ठपका ठेवत जिल्हा सत्र न्यायालयाने भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांना एक महिना कारावास आणि एक लाख रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. या निर्णयामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली असली, तरी गंभीर आरोपांतून दिलासा मिळाल्याने राणे समर्थकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

गंभीर कलमांतून सुटका, एका कलमात अडकले
न्यायालयाने या प्रकरणातील ४० संशयित कार्यकर्त्यांसह नितेश राणे यांची सरकारी कामात अडथळा आणणे (कलम ३५३) आणि मारहाण करणे (कलम ३३२) यांसारख्या गंभीर गुन्ह्यांतून निर्दोष मुक्तता केली. मात्र, उपअभियंत्याला शिवीगाळ करणे आणि शांततेचा भंग करणे (कलम ५०४) या आरोपात न्यायालयाने राणेंना दोषी ठरवले. याच गुन्ह्यासाठी त्यांना तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली.

पाच वर्षांपूर्वीचा ‘तो’ थरार
ही घटना जुलै २०१९ मधील आहे. त्यावेळी काँग्रेसमध्ये असलेल्या नितेश राणे यांनी मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांच्या प्रश्नावर आक्रमक पवित्रा घेतला होता. कणकवलीतील एका पुलावर महामार्ग प्राधिकरणाचे उपअभियंता प्रकाश शेडेकर यांना बोलावून, त्यांच्यावर राणे आणि त्यांच्या समर्थकांनी चिखलफेक केली होती. या घटनेच्या व्हायरल व्हिडिओने संपूर्ण देशभर खळबळ उडवून दिली होती.

हायकोर्टात धाव घेणार
न्यायालयाने शिक्षा सुनावताच नितेश राणे यांच्या वकिलांनी या निर्णयाला आव्हान देण्यासाठी शिक्षेला स्थगिती देण्याची विनंती केली. उच्च न्यायालयात अपील करण्यासाठी न्यायालयाने शिक्षेला तात्काळ स्थगिती दिली आहे. परिणामी, नितेश राणे यांना सध्या कोठडीत जावे लागणार नसून, ही लढाई आता उच्च न्यायालयात लढली जाईल.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!