Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

गॅस टंचाईवर सरकारचा ‘प्लॅन बी’ तयार! आता पेट्रोल पंपांवर मिळणार रॉकेल; मंत्री छगन भुजबळांची मोठी घोषणा

गॅस टंचाईवर सरकारचा ‘प्लॅन बी’ तयार! आता पेट्रोल पंपांवर मिळणार रॉकेल; मंत्री छगन भुजबळांची मोठी घोषणा

Maharashtra Gas Shortage: राज्यात सध्या जाणवणारा घरगुती गॅसचा (LPG) तुटवडा आणि सिलिंडरसाठी सर्वसामान्यांची होणारी ओढाताण थांबवण्यासाठी राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. गॅस उपलब्ध नसल्यास पर्यायी इंधन म्हणून आता थेट पेट्रोल पंपांवर केरोसिन (रॉकेल) उपलब्ध करून दिले जाणार आहे. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सोमवारी विधिमंडळात या संदर्भात माहिती दिली. या निर्णयामुळे गॅस टंचाईचा सामना करणाऱ्या गृहिणींना आणि सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

पेट्रोल पंपांवर विक्री आणि भेसळ रोखण्यासाठी नवी योजना
राज्यातील गॅस टंचाईवर तातडीचा उपाय म्हणून सरकारने बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर केरोसिन आणण्याचे ठरवले आहे. विशेष म्हणजे, रॉकेलमध्ये होणारी भेसळ रोखण्यासाठी ते अधिकृत डिलर्सऐवजी थेट BPCL, HPCL आणि IOCL यांसारख्या नामांकित पेट्रोलियम कंपन्यांच्या पेट्रोल पंपांवर विकले जाणार आहे. उज्ज्वला योजनेव्यतिरिक्त इतर नागरिकांनाही याचा लाभ घेता यावा, यासाठी सरकार आवश्यक ती कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत असून लवकरच याची अंमलबजावणी सुरू होईल.

गॅस उत्पादनात वाढ आणि पुरवठ्याचे नवे प्राधान्यक्रम
मंत्री भुजबळ यांनी पेट्रोलियम कंपन्यांसोबत झालेल्या चर्चेचा तपशील सभागृहात मांडताना सांगितले की, राज्यातील गॅस उत्पादन दिवसाला 9000 मेट्रिक टनवरून 11000 मेट्रिक टन करण्यात आले आहे. पुरवठ्याबाबतही नवीन नियमावली तयार करण्यात आली असून, घरगुती ग्राहकांनंतर उरलेला गॅस रुग्णालय, वृद्धाश्रम, शैक्षणिक संस्था आणि स्मशानभूमींना 100 टक्के प्राधान्याने दिला जाईल. तसेच, औषध उद्योग आणि लष्करी कॅन्टीनसाठी 50 टक्के पुरवठा राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

काळाबाजारावर कठोर कारवाई: भरारी पथके तैनात
एलपीजीच्या टंचाईचा फायदा घेऊन सुरू असलेल्या काळाबाजारावर सरकारने आता कारवाईचा बडगा उगारला आहे. आतापर्यंत विविध ठिकाणी टाकलेल्या धाडींमध्ये 1208 गॅस सिलिंडर आणि सुमारे 33 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष भरारी पथके तैनात करण्यात आली आहेत. “गॅस टंचाईचा प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही केंद्र सरकारच्या सतत संपर्कात आहोत. परिस्थिती पूर्वपदावर येईपर्यंत नागरिकांची सोय म्हणून केरोसिनचा पर्याय दिला जात आहे,” असे छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!