Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Maharashtra Weather Alert: राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस बरसणार! IMD कडून विजांचा कडकडाट आणि वादळासह यलो अलर्ट जारी

Maharashtra Weather Alert: राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस बरसणार! IMD कडून विजांचा कडकडाट आणि वादळासह यलो अलर्ट जारी

Maharashtra Weather Alert: भारतीय हवामान विभागाने (IMD) महाराष्ट्रातील अर्ध्या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. पुढील 24 तासांत मुसळधार पाऊस, विजांचा कडकडाट, वादळ आणि 30-40 किमी प्रतितास वेगाने सोसाट्याचे वारे येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मुंबई व कोकणात पावसाने तात्पुरती विश्रांती घेतली असली तरी पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पाऊस सुरू असून पूरसदृश परिस्थिती कायम आहे. वरिष्ठ हवामानशास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी 13 ते 15 सप्टेंबरदरम्यान मुंबई, उत्तर कोकण आणि अंतर्गत महाराष्ट्रात पावसाची तीव्रता वाढण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. मात्र 16 सप्टेंबरपासून कोकणात पावसाचा जोर कमी होऊन केवळ हलक्या सरींची शक्यता राहील.

जिल्हानिहाय परिस्थिती

चंद्रपूरमध्ये 24 तासांत 28 मिमी पाऊस नोंदवला गेला. नद्या व धरणांची पाणीपातळी वाढल्याने नदीकाठच्या गावांसाठी पूर सतर्कता जारी करण्यात आली. आतापर्यंत जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या 96.2 टक्के पाऊस झाला आहे. सोलापूर मध्ये अक्कलकोट तालुक्यातील शिरशी गावात मुसळधार पावसामुळे ओढे वाहू लागले आहेत. याशिवाय, धाराशिवमध्ये अतिवृष्टीमुळे 2 लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले. जिल्ह्यातील 42 पैकी 23 मंडळे प्रभावित झाली असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

दरम्यान, हवामान विभागाने मुंबई व कोकणात हलक्या सरींचा अंदाज वर्तवला आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात मुसळधार पाऊस आणि पूरसदृश परिस्थिती निर्माण होणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. तथापी, 13-15 सप्टेंबर दरम्यान, अंतर्गत महाराष्ट्र व उत्तर कोकणात पावसाचा जोर वाढणार आहे. तसेच 16 सप्टेंबरपासून कोकणात पावसाची तीव्रता कमी होणार आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!